-
संग्रहित छायाचित्र
-
पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
-
सध्या मुंबई रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे २० एप्रिलनंतर काही प्रमाणात देण्यात आलेली शिथिलताही राज्य सरकारनं मुंबई-पुण्यात रद्द केली आहे. दररोज मुंगीलाही जाण्यासाठी वाट न भेटणाऱ्या मुंबईतील रस्त्यावर शुकशुकाट आहे.
-
पुण्यातही करोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तर करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्याही सरकारकडून करण्यात येत आहे.
-
राज्यात काही भागात करोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. तर काही जिल्ह्यात एकही करोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांमधील व्यवहार बंद न ठेवता, ज्या जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झालेला नाही. अशा जिल्ह्यात व्यवहार सुरू करण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत.
-
या सरकारनं करोनाच्या स्थितीनुसार जिल्ह्यांचं झोनमध्ये वर्गीकरण केलं आहे. यात रेड, ऑरेंज, ग्रीन असे तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत.
-
संग्रहित छायाचित्र
-
२८ दिवस नव्यानं एकही रुग्ण आढळून आला नाही, असा जिल्हा ग्रीन झोनमध्ये वर्ग केला जातो.
-
केंद्र सरकारनं २० एप्रिलनंतर काही व्यवहारांना शिथिलता दिली. त्यानंतर राज्य सरकारनं ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील उद्योग कर्मचारी आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
-
हे उद्योग सुरू करताना कर्मचाऱ्यांच्या राहण्यासह सर्व व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्हे रेड झोनमधून हळूहळू ऑरेंज झोनच्या काठावर पोहोचले आहेत.

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’