-
करोना विषाणूचा प्रादूर्भाव आणि लॉकडाउन या दुहेरी पेचात अडकलेल्या देशभरातील मजूर वर्गाला अखेरीस एक चांगली बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. ( सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
राज्यभरासह देशातील अनेक महत्वाच्या शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत.
-
पण ज्यांना रेल्वेचा प्रवास शक्य नाही, त्यांनी पायी चालत जात किंवा सायकलवरुन आपलं गाव गाठायचं ठरवलं आहे.
-
मुंबई-आग्रा महामार्गावरुन आपल्या गावाकडे निघालेले कामगार, आता काही झालं तरी लवकरात लवकर आपलं गाव गाठायचं ही भावना प्रत्येकाच्या मनात असते.
-
चालत प्रवास हा नक्कीच सोपा नाही, उन्हाने बेजार झालं की रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधून उभं रहायचं.
-
काही कामगारांनी तर थेट सायकलवरुन आपलं गाव गाठायचं ठरवलं आहे.
-
संकट कितीही मोठं असलं तरी जीवन हे सायकल प्रमाणेच असतं. चालत राहणं भाग आहे याची सर्वांना जाणीव आहे.
-
सायकल चालवून जीव थकला की मध्ये थांबायचं, सोबत असलेलं पाणी प्यायचं थोडा आराम करायचा हे सर्व कामगारांनी आता ठरवलं आहे.
-
नावापुरते पोटात दोन घास गेले आणि सोबतीला पाण्याची एक बाटली घेतली की हे कामगार लगेच पुढच्या प्रवासाला लागतात.
-
रस्त्यात जिथे पाणपोई दिसेल तिकडे थांबायचं, सायकल रस्त्यावर आडवी टाकायची आणि पाणी भरुन घ्यायचं
-
एवढ्या मोठ्या प्रवासात सायकल आणि पाण्याची बाटली हेच या कामगारांचे सच्चे साथीदार आहेत.
-
पाणी भरलं की परत सायकल चालवत पुढचा प्रवास सुरु करायचा. काही केल्या आता शहरात थांबायचं नाही हे या कामगारांनी आता जणू ठरवूनच टाकलं आहे.
Tejashwi Yadav Election Result: तेजस्वी यादव यांचा अखेर विजय; भाजपाच्या सतीश कुमार यांचा केला पराभव