पुणे : आषाढी वारीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहकारनगर भागातील एका उंच सार्वजनिक भिंतीवर विठुराया आणि पांडुरंगाची चित्रे चितारताना कलाकार. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे) पायी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत यंदा पहिल्यांदाच खंड पडला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पायी वारी रद्द करण्यात आली आहे. देहूतून संत तुकाराम आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे शहरातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या पेंटिंग्जमध्ये विठुराया, संत तुकाराम महाराज, पारंपारिक लोककला जपणारे वासुदेव, नंदीबैल आणि हातात पताका घेऊन निघालेले वारकरी दिसत आहेत. यंदा पायी वारी रद्द झाल्याने ती शहरातून जाणार नाही. मात्र, वारीचा तो उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हणून पालिकेनं सहकार नगर भागात सार्वजिनिक भिंतींवर पेंटिंग्ज केली आहेत. -
वारीच्या पार्श्वभूमीवर काढलेली ही आकर्षक पेटिंग्ज पाहण्याचा आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपण्याचा अनेकांना मोह आवरत नाही.
या काळात पालख्यांचा शहरात मुक्काम असल्याने दोन दिवस संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेलं असतं. त्यासाठी पालखी मार्गावर महापालिकेकडून ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स आणि भिंतींवर पेंटिग्ज केली जातात. -
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असले तरी त्यांचा मुक्काम आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसापर्यंत मुख्य मंदिरातच असणार आहे. एकादशीसाठी त्या विशेष विमानानं किंवा वाहनानं पंढरपूरला नेण्यात येणार आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा