-
भारतामधील दुसरा ग्लास ब्रिज म्हणजेच काचेपासून बनवण्यात आलेला पूल हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे बांधला जात आहे.
-
वन विभागाच्या माध्यमातून एका सफारीचा भाग म्हणून हा पूल बांधण्यात येत आहे. हा ब्रिज चीनमधील हँगझोऊ ब्रिजप्रमाणे बांधला जाणार असून त्यावरुन समोरचे डोंगर पाहण्याबरोबरच दरीत डोकावण्याचा आगळा वेगळा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
-
नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी भेट दिली होती.
-
यावेळी नितीश कुमार यांनी राजगीरमधील या ग्लास ब्रिज प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेतली.
-
नितीश कुमार यांनी या प्रकल्पाची रचना कशी आहे तो कसा उभारला जाणार आहे हे तेथील अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं.
-
नितीश कुमार यांनी या पुलाच्या मजबुतीसंदर्भातील माहितीही अधिकाऱ्यांकडून घेतली.
-
नितीश कुमार यांनी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन मार्च २०२१ पर्यंत पर्यटकांसाठी खुला होईल अशी माहिती या ब्रिजची पहाणी केल्यानंतर दिली होती.
-
राजगीरमधील हा ग्लास ब्रिज २०० फूट उंच असून ८५ फूट लांब तर ६ फूट रुंद असणार आहे.
-
एका वेळेस ४० पर्यटक या पुलावर जाऊ शकणार आहेत. हा ब्रिज मजबूत केबल्स आणि साखळ्यांनी बांधण्यात आलाय.
-
राजगीर हे गौतम बुद्धांचा ऐतिहासिक वारसा असणारं शहर म्हणून लोकप्रिय असून हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळही आहे. या ठिकाणी निसर्ग दर्शन आणि रोप वे सायकलिंगसारख्या गोष्टींचीही निर्मिती करण्यात आली आहे.
-
बिहार सरकारने स्कायवॉक प्रकल्प उभारण्यासाठी ५०० एकर जमीन दिली आहे. याच जमीनीवर सध्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प उभारले जात आहेत.
-
बिहारमधील हा ग्लास ब्रिज अशाप्रकारचा देशातील दुसरा ग्लास ब्रिज आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा असा ब्रिज उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये बांधण्यात आलाय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?