-
रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या नात्याचा सुंदर उत्सव आहे. श्रावण पौर्णिमेला देशभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण प्रेम आणि संरक्षणाची भावना जपतो. (फोटो-फ्रीपिक)
-
काही ठिकाणी बहिणी सैनिकांना राखी बांधतात; तर काही ठिकाणी झाडे किंवा नद्या यांना बांधून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतात. या वेगवेगळ्या परंपरांमुळे रक्षाबंधन हा प्रत्येक राज्याच्या दृष्टीने खास सण बनतो.(फोटो-फ्रीपिक)
-
राजस्थानमध्ये रक्षाबंधनाचा खास ठसा आहे. इथे बहिणी फक्त भावांनाच नव्हे, तर झाडांनाही राख्या बांधतात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प घेतात. काही ठिकाणी भावांना ‘राजे’ मानून मुकुटही घालतात.(फोटो-फ्रीपिक)
-
कोळी समाजातील महिला मच्छीमार भावांना राखी बांधतात आणि समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. (फोटो-सोशल मीडिया)
-
उत्तर प्रदेशात बहिणी फक्त भावांनाच नव्हे, तर सैनिक आणि पोलिसांनाही राखी बांधून, त्यांच्याप्रति अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करतात.करतात. (फोटो-सोशल मीडिया)
-
झारखंड आणि छत्तीसगडमधील आदिवासी समाजात राखी सण संपूर्ण समुदायाच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. इथे राखी ही फक्त भाऊ-बहिणींपुरता मर्यादित नाही, तर समाजाच्या ऐक्याचे ते प्रतीक आहे.(फोटो-सोशल मीडिया)
-
उत्तराखंड ही देवभूमी असल्याने तेथे रक्षाबंधनाला धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पंडित रक्षासूत्र म्हणून यजमानाला राखी बांधून विधी करतात, जे अध्यात्माचे दर्शन मानले जाते. (फोटो-सोशल मीडिया)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”