कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. राज्यातील रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे दोन दिवस पाण्याखालीच गेले होते. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.