‘जर काही घडलं तर त्याला बोम्मई जबाबदार’; कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर शरद पवार आक्रमक
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न अजून चिघळला असून आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याकडे लक्ष वेधले आहे. 'जर काही घडलं तर त्याला बोम्मई जबाबदार असतील. हा प्रश्न लवकर सुटणं गरजेचं आहे. सीमाभागतील हे प्रकरण ४८ तासांत थांबवा नाहीतर मला स्वतःला तिकडे जावं लागेल' असा आक्रमक इशाराही शरद पवारांनी दिला.