नाशिकमधील ५० पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. निष्ठावंत आमच्यासोबतच असल्याचं ते म्हणाले. सोबतच रोजगाराच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरूनही त्यांनी पुन्हा टीका केली आहे.