Sudhir Mungantiwar: ‘महाराष्ट्रातील लोकांनी अशा कमजोर व्यक्तींना…’; मुनगंटीवारांची ठाकरेंवर टीका
‘सत्ताधारी बारसूच्या प्रकल्पासाठी माझ्या नावाचं पत्र नाचवत आहेत, परंतु गद्दारांच्या रेट्यामुळेच मी ते पत्र दिलं होतं’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाषणात केल्यानंतर ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाणार प्रकल्पाच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यासाठी दुसरी पर्यायी जागा देऊ. मग त्यांनीच बारसू प्रकल्पासाठी पत्रं दिली, इथे प्रकल्प व्हावा अशी त्यांचीच सुचना होती. पण ते आता सत्तेतून गेले. आता त्यांना उपरती सुचली आहे. आता ते म्हणतात दुसऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी तसं केलं आणि पत्र दिलं. मुख्यमंत्रीपदावर असताना स्वतःच्या मर्जीने ते काम करू शकत नाहीत तर त्यांनी राज्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू नये