Chinab River Dam Doors Shut After Water Treaty Stopped: दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून भारताने चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्पातील पाणीपुरवठा थांबवला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यांनतर जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील काही दृश्य समोर येत आहेत. सलाल धरणाच्या परिसरातून स्थानिकांनी सांगितलेली स्थिती जाणून घेऊया..