scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Bahujan Vikas Aaghadi President Hitendra Thakur's attack on BJP
Hitendra Thakur Slams BJP: प्रश्न निवडणूक आयोगाला.. उत्तर भाजपचे.. हितेंद्र ठाकूरांचा भाजपला टोला… केले गंभीर आरोप

बहुजन विकास आघाडीने ही शहरातील विविध ठिकाणच्या भागात कार्यकर्ता संवाद बैठका सुरू केल्या आहेत.

Girish Mahajan's strategy is under discussion in BJP in the backdrop of local elections
Girish Mahajan : जळगाव भाजपमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात नाराजांची फळी सक्रीय…?

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होणार…

rahul gandhi accuses bjp of dual voter fraud in haryana
मतचोरीत भाजपच्या नेत्यांचा थेट सहभाग – राहुल गांधी यांचा आरोप

भाजपचे नेते व कार्यकर्त्यांची नावे हरियाणा व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांच्या मतदारयाद्यांमध्ये आढळली आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते…

rahul gandhi alleges 25 lakh fake voters in haryana assembly election
हरियाणामध्ये ‘सरकार चाेरी’, राज्यात २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधी यांचा आरोप

विशेष म्हणजे एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावाचा वापर १० मतदान केंद्रांवर २२ वेळा करण्यात आला, असा आरोप करत बिहार विधानसभा निवडणुकीतही…

Oriental Research Asiatic Society Election Polls BJP Progressives Vinay Sahasrabuddhe Kumar Ketkar mumbai
‘एशियाटिक सोसायटी’ निवडणुकीत भाजप विरुद्ध पुरोगामी अशी चुरस…

Asiatic Society Mumbai : प्राच्यविद्या संशोधन परंपरा असलेल्या ‘एशियाटिक सोसायटी’च्या १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि…

Sanjay Jagtap BJP Entry Changes Jejuri Municipal Council Election Equation Dilip Barbhai pune
माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशाने समीकरणांमध्ये बदल…

Jejuri Municipal Council : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जेजुरी नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे आणि वर्चस्वाची चर्चा…

Talegaon Dabhade Municipal Council Election Confusion NCP Sunil Shelke BJP Santosh Dabhade Maval Pattern pune
आमदारांच्या खेळीने भाजपमध्ये संभ्रमावस्था…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे संतोष दाभाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर…

Eknath Shinde Ganesh Naik Sanjeev Political Rivalry BJP Strategy Municipal Elections Thane
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे निवडणूक प्रभारी गणेश नाईक; नवी मुंबईतही संजीव नाईक यांच्यावर जबाबदारी…

Ganesh Naik, Eknath Shinde : ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकांसाठी भाजपकडून नाईक पिता-पुत्रांची नियुक्ती करून शिंदे गटाला अप्रत्यक्ष आव्हान दिल्याची…

BEST Financial Crisis Protest BJP Shashank Rao Union Hunger Strike Gratuity Commission Permanent Buses Fleet mumbai
बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी शशांक राव उपोषणाला बसणार! १० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण…

Shashank Rao BEST : राज्यात भाजपची सत्ता असतानाही व स्वतः शशांक राव भाजपमध्ये असूनही बेस्टच्या समस्यांवर तोडगा निघत नसल्याने कर्मचारी…

bjp mla mangesh chavan
“बजेट कमी पडणार नाही, चिंता करू नका…”, पाचोऱ्यात भाजप आमदाराचे जाहीर सभेत वक्तव्य !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण झपाट्याने तापू लागले आहे.

MNS Navi Mumbai Fake Voters Exhibition Gajanan Kale Election Commission Criticism BJP Leaders Spokespersons
निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून भाजपा नेत्यांनी प्रदर्शनाला यावे, मनसे नेत्याची खोचक टीका…

MNS Gajanan Kale : मनसे नेते गजानन काळे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून भाजपच्या नेत्यांनी या प्रदर्शनाला यावे, अशी…

ताज्या बातम्या