scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Mahayuti shivsena bjp ncp to Contest All Upcoming Local Elections in Ratnagiri
रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार; शिवसेना शिंदे गटाचा निर्णय

राज्य पातळीवरील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांची चर्चा

BJP MP son on bail in IAS officers daughter sexual harassment case appointed law officer in Haryana
BJP MP’s Son Appointed Law Officer : जामिनावर सुटलेला भाजपा खासदार पुत्र बनला ‘लॉ ऑफिसर’; IAS अधिकार्‍याच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी झाली होती अटक

खासदार सुभाष बराला यांचा मुलाक विकास बराला याची हरियाणा येथे असिस्टंट अॅडव्होकेट जनरल (एएजी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

shivsena jalgaon loksatta news
हलक्यात घेऊ नका… जळगावमध्ये शिंदे गटाचा भाजपला इशारा

महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्यानंतर सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा मनोदय भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी नुकताच व्यक्त केला.

Akhilesh Yadav News
Akhilesh Yadav : अखिलेश यादवांची मशिदीमध्ये राजकीय बैठक; भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने केला निषेध

दिल्लीतील संसद भवनाजवळ असलेल्या मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित बैठक घेतल्याचा वाद आता आणखी चिघळला आहे.

Nagpur rain damage 2025 BJP leader exposes scam in flood relief collection from victims in Nagpur
नागपुरात पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या नावावर ३ हजार रुपयांची वसूली; भाजपचा नेता म्हणतो…

हा गंभीर प्रकार असून त्यांनाही नागरिकांचे २ ते ३ हजार रुपये घेण्याचे आधिकार दिले कुणी? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला…

Nitin Gadkari to receive Lokmanya Tilak National Award 2025 for contribution to infrastructure development India
पंतप्रधान मोदींनंतर आता नितीन गडकरी ठरले या पुरस्काराचे मानकरी; योगायोग की मोदींच्या निवृत्तीनंतर गडकरी…

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय…

Despite BJPs warning banners and ads flood Mumbai for Devendra Fadnavis birthday celebrations
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिराती व कॉफी टेबल बुकही

वाढदिवसानिमित्ताने फलकबाजी, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाहिराती करू नयेत, अशा सूचना फडणवीस यांनी जाहीरपणेही दिल्या होत्या आणि प्रदेश भाजपनेही तसे आवाहन केले होते.

Eknath Khadse demands SIT probe into honeytrap case linked to BJP minister Girish Mahajan Political rivalry in Jalgaon
प्रफुल्ल लोढा प्रकरणामुळे खडसे-महाजन संघर्षाला नवी धार

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध…

Congress in dilemma over loyalists after Sanjay Jagtap joins BJP Leadership crisis in Pune Congress
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये ‘संशयकल्लोळ’…जिल्हाध्यक्षपदाचे त्रांगडे!

जगताप यांनी त्यांच्या कार्यकारिणीत अनेक जवळच्या साथीदारांना संधी दिली असल्याने जगतापांचे निष्ठावंत कोण आणि त्यांना पक्षात ठेवायचे की त्यांची हकालपट्टी…

Maharashtra Breaking News Live Updates : “विधानसभेत रंगला रम्मीचा डाव, कृषिमंत्री चले जाव!”, कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शने

Maharashtra Politics Live News Updates, 23 July 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Jagdeep Dhankhar resignation news
आदेशा’ने पायउतार ! उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क

खरगे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला. यामुळेही भाजप नेतृत्व नाराज असल्याचे समजते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री…

ताज्या बातम्या