scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Dilip Wagh showing timely caution confirmed his support and joined the BJP on Tuesday
पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा अखेर भाजप प्रवेश

दिलीप वाघ यांनी ऐनवेळी सावध भूमिका घेत आपली भाजपकडे ओढ असल्याचे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार, मंगळवारी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला.

ऑपरेशन लोट्स'अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने त्या दोन आमदारांना पक्षातून का काढलं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
MLAs suspended : ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने ‘त्या’ दोन आमदारांना पक्षातून का काढलं?

Two MLAs suspended For BJP : भाजपाने आपल्या दोन विद्यमान आमदारांची पक्षातून हकालपट्टी कशामुळे केली? इतकं गंभीर काय घडलं? याबाबत…

modi alert bjp leaders
पंतप्रधान मोदींनी भाजपा नेत्यांना का फटकारले? कोणकोणत्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद ओढवले?

BJP leaders comment controversy पंतप्रधान मोदींनी भाजपा नेत्यांना प्रत्येक मुद्द्यावर बोलणे टाळावे असा सल्ला दिला.

आसाममध्ये काँग्रेसची नवी खेळी, विधानसभा निवडणुकांआधी गौरव गोगोईंची प्रदेशाध्यक्षपदी निवड

गौरव गोगोई यांनी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाल्यानंतर…

Karnataka BJP expels MLAs ST Somashekar Shivaram Hebbar
भाजपाकडून दोन आमदारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी, कर्नाटकच्या राजकारणात चाललंय काय?

Karnataka BJP expels MLAs : ही कारवाई करण्यापूर्वी भाजपाच्या मुख्य प्रतोदांनी दोन्ही आमदारांना नोटीस बजावून त्यांच्याकडून रितसर उत्तर मागितलं होतं.

ऑपरेशन सिंदूरनंतर बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानांना मिठी मारली असती, गृहमंत्री अमित शाह असं का म्हणाले?

अमित शाह यांनी यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात…

Karnataka BJP Leader Stirs Row After Calling IAS Officer Pakistani FIR Lodged
भाजपा आमदाराचं मुस्लीम महिला IAS अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह विधान, गुन्हा दाखल; प्रकरण काय?

Karnataka BJP leader N Ravikumar stirred a controversy कर्नाटकमधील भाजपा आमदाराने मुस्लीम आयएएस अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेस आक्रमक झाल्याचे…

तेज प्रताप यांच्याबरोबर मालदीवमध्ये कोण होतं? चॅट्स व्हायरल, काय म्हणाले भाजपा नेते? प्रीमियम स्टोरी

तेज प्रताप यादव हे काही दिवसांपूर्वीच मालदीवला गेले होते. यासंदर्भातले त्यांचे चॅट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेज प्रताप…

BJP CPIM Vedan controversy news in marathi
युवा रॅपस्टारमुळे केरळच्या राजकारणात द्वंद्व? माकप विरुद्ध भाजप संघर्षात ठिणगी! प्रीमियम स्टोरी

रॅपर वेदन हा वाट चुकलेला युवक असून, तो जिहादींच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप भाजप परिवारातून केला जातो. तर युवकांच्या वेदना…

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेला खटला पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी बंद केला आहे.

ताज्या बातम्या