scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
congress Praful Guddhe
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात ३७७१२ बोगस मतदारांची नोंदणी, काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने…

Bhalchandra Congo criticizes BJP over hatred between Hindus and Muslims nashik news
प्रत्येक प्रश्नाला मुस्लिमद्वेषी किनार देण्याचा प्रयत्न; डाॅ. भालचंद्र कांगो यांची भाजपवर टीका

देशात भाजपकडून हिंदू-मुस्लिम यांच्यात व्देष पसरवून अस्थिरता निर्माण केली जात आहे. प्रत्येक प्रश्नाकडे हिंदू – मुस्लिम म्हणून बघितले जात असन…

भाजपाचे माजी आमदार सुरेश राठौर व अभिनेत्री उर्मिला सनावर (छायाचित्र सोशल मीडिया)
अभिनेत्रीशी लग्न करणाऱ्या भाजपा नेत्याला पक्षाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे कारण?

BJP MLA Marriage Controversy : अभिनेत्रीशी लग्न करणाऱ्या भाजपाच्या माजी आमदाराला पक्षश्रेष्ठींनी नोटीस बजावली आहे. नेमके काय आहे यामागचे कारण?…

sanjay waghule
राज्यात भाजपचा गृहमंत्री, तरीही आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल; ठाण्यातील भाजपच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही महिन्यांपासून बनावट प्लेसमेंट आणि प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. जुजबी कागदपत्रांच्या आधारे संस्था सुरु करून विद्यार्थ्यांना…

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार? ‘आप’च्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Arvind Kejriwal on Rajya Sabha : लुधियाणा पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’चे उमेदवार संजीव अरोरा विजयी झाल्यानंतर पंजाबमधील राज्यसभेची जागा रिक्त…

hari bhau bagde rss remarks on ideology and education system
सध्याची परिस्थिती संघाला हवी तशीच, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मत

‘स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चंट्स असोसिएशन’च्या वतीने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘व्यापारी एकता दिना’निमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात…

Will Madan Patil group support MP Vishal Patil after Jayshree Patil joins BJP sangli news
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मदन पाटील गट खासदार विशाल पाटील यांना साथ देणार ?

गेल्या दहा वर्षाच्या राजकीय वाटचालीत सावलीसारखा ठामपणे उभा असलेल्या मदन पाटील यांचा गट जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप…

पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खूश आहे. तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य लोकसत्ता)
BJP Defeat in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही ‘आप’ने गुजरातमध्ये भाजपाला हरवलं; पोटनिवडणुकीत नेमकं काय घडलं?

BJP loss in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही गुजरातमधील विसावदर विधानसभा निवडणुकीत आपने विजय मिळविला असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे.

पश्चिम बंगाल येथील भाजपाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. (छायाचित्र पीटीआय)
BJP MLAs Suspended : भाजपाच्या ४ आमदारांचं तडकाफडकी निलंबन; विधानसभेत नेमकं काय घडलं? प्रीमियम स्टोरी

BJP MLAs Suspended News : विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या ४ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.