scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Two senior leaders quit Congress in Jalgaon district Congress crisis deepening party crisis
जळगावात काँग्रेसला पुन्हा धक्का… प्रतिभा शिंदे यांच्यानंतर ‘या’ पदाधिकार्‍याचा राजीनामा

गेल्या ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी तो आणखी मोठा दुसरा धक्का मानला जात आहे.

Sangh family, Hindutva in India, Swami Govinddev Giri speech, Ram Janmabhoomi Tirthshetra,
आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित… स्वामी गोविंददेव गिरी यांचे भाजपला अप्रत्यक्ष खडेबोल

‘मृत्यूंजय भारत’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पुण्यातील मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील गणेश सभागृहात स्वामी गोविंद गिरी यांच्या…

Anurag Thakur criticizes BJP over vote rigging issue
‘मतचोरी’च्या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोप; रायबरेली, वायनाडमध्ये अनियमितता; भाजपचा दावा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवडय़ात केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

bjp aarti sathe loksatta
भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची अखेर न्यायमूर्तीपदी नियुक्ती

साठे यांच्या नियुक्तीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेवून भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली…

social initiative by thane dahihandi navyug mandal
Dahihandi 2025 News : ठाण्यात दहीहंडीउत्सव मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी.., रुग्णांना मदतीसाठी पुढे केला हात…

ठाण्यातील नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली…

minister Kapil patil on Bhiwandi murder case
…तर भिवंडीतील प्रकार टाळला असता! – माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची कठोर कारवाईची मागणी

२०२१ मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

mim dhule office bearers resign en masse
एमआयएम पक्षात भूकंप… प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

स्थानिक समस्यांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

bjp grand tricolor rally
मलकापूरला भाजपच्यातिरंगा रॅलीस प्रतिसाद; देशभक्तिपर घोषणांनी परिसर भारावून गेला

‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणांसह देशभक्तिपर गाणी व घोषवाक्यांनी रॅलीदरम्यान, देशप्रेमाचे वातावरण निर्माण बहरले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
राहुल गांधी म्हणतात, पिक्चर अभी बाकी है! मतचोरी संदर्भात सादर करणार आणखी पुरावे?

Rahul Gandhi election allegations : “फक्त एकाच जागेवरच नव्हे तर अनेक जागांवर मतचोरी झाली आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले…

Bhiwandi BJP office bearers murder case Inquiry
भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांची चौकशी, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

पूर्व वैमन्यस्यातून किंवा राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

social initiative by thane dahihandi navyug mandal
मुंबईत ‘लाख’मोलाच्या दहीहंड्या, मात्र बक्षिसाच्या प्रत्यक्ष रक्कमेबाबत संभ्रम

राजकीय मंडळींकडून मुंबईत ठिकठिकाणी लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. फलकबाजीवर दिसणाऱ्या ‘लाख’मोलाच्या दहीहंडी उत्सवात प्रत्यक्षरित्या थरनिहाय किती रक्कम…

restoration work of tuljabhavani temple locals blocked jitendra awhad vehicle alleging defamation Ncp BJP workers clashed with slogans
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारावरून वाद; तुळजापुरात राष्ट्रवादी – भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

आव्हाड तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराची बदनामी करीत असल्याचा सांगत स्थानिक तुळजापूरकरांनी आव्हाडांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी आणि…

ताज्या बातम्या