scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Discussion on the inspection tour on a bike of the Additional Commissioner of Mira Bhayandar Municipal Corporation
Mira Bhayandar News : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताच्या दुचाकीवरून पाहणी दौऱ्याची चर्चा…

नादुरुस्त रस्ते, शिवसेना आणि भाजपची अंतर्गत धुसफूस, महापालिकेचे विविध निर्णय, मेट्रो, उड्डाणपूल या आणि अशा अनेक  विषयांमुळे नेहमीच चर्चेत असणारं…

BJP
सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: भाजप-शिंदे गटात ‘स्वबळा’ची तयारी; तिरंगी लढतीची शक्यता!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.भाजपने ‘स्वबळा’चा नारा दिल्याने जिल्ह्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव बाळासाहेब…

BJP state president Ravindra Chavan
भाजपची पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, आगामी कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि…

BJP
‘ या ‘ तारखेस होणार भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर, स्थानिक पातळीवर केवळ…

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पक्षीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. संघटना सर्वप्रथम या तत्वावर चालणाऱ्या भाजपमध्ये मात्र पूर्वीच बैठका…

Eknath Shinde's bitter opponent will devise BJP's election strategy
एकनाथ शिंदेंचा कडवा विरोधक आखणार भाजपच्या निवडणुकीची रणनीती ; शिंदेंना ‘शह’ देण्याचा भाजपचा डाव?

ठाणे – भाजपने ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या विरोधक गणेश नाईक आणि संजय केळकर यांना जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा.…

Muralidhar Mohola takes charge of local government elections
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळांकडे ‘ ही’ मोठी जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. येत्या दोन डिसेंबरला जिल्ह्यातील १४ नगर परिषद, ३ नगरपंचायत निवडणुका होणार…

In the backdrop of the upcoming municipal elections, Ajit Pawar held a meeting of office bearers of Pimpri-Chinchwad in Mumbai
पिंपरी : भाजपनंतर आता राष्ट्रवादीची स्वबळावर लढायची तयारी; अजित पवार म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना’…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक घेतली.

bihar first phase election voting turnout details
बिहारमध्ये ६५ टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. ६४.४६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.

Rahul Gandhi
अन्वयार्थ : ‘हायड्रोजन बॉम्ब’ तर फोडला, आता पुढे काय?

महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाणामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले…

Bihar Election : दिल्लीनंतर बिहारमध्येही केलं मतदान? विरोधकांचे फोटो शेअर करत भाजपा नेत्यावर गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस आणि आपने भाजपाचे नते राकेश सिन्हा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या