scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
sangamner mla Amol Khatal
पठार भागातील जनतेला सुविधांपासून वंचित ठेवत केवळ मतांसाठी वापर, आमदार अमोल खताळ यांचा आरोप

आमदार खताळ म्हणाले, पठार भागातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लावले जातील. विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले.

kolhapur mahayuti news in marathi
कोल्हापुरात महायुतीत जागा वाटपाचे सूत्र कळीचा मुद्दा

कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढली जाणार हे पुनःपुन्हा स्पष्ट केले जात असले तरी तिन्ही पक्षातील जागावाटप हा कळीचा मुद्दा…

Chandrashekhar bawankule
महसूल मंत्री बावनकुळेंच्या दौऱ्यातही भाजपतील गटबाजीचे उघड प्रदर्शन, स्थानिकांसह वरिष्ठ नेतेही…

पूर्वी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातही गटबाजी आणि मतभेद होते.

Former BJP corporator remanded in police custody in firing case in Nashik
गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीस कोठडी… अटकेच्या कारवाईवर गिरीश महाजन काय म्हणाले ?

अवघ्या काही दिवसांत भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 RSS centenary celebrations nagpur vijayadashami parade mohan bhagwat review route details events
RSS Centenary Vijayadashami Celebrations : शताब्दी वर्षात संघाचे नागपुरात तीन ठिकाणी पथसंचलन, सरसंघचालक….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी वर्षांतील विजयादशमी उत्सवानिमित्त नागपुरात तीन ठिकाणी पथसंचलन…

ganesh naik confirms navi mumbai airport inauguration not on september 30 d b patil name sparks political tension
Navi Mumbai Airport ः विमानतळाचे उद्घाटन ३० तारखेला नाही; विमानतळाला दि.बा.पाटलांच नाव…

Navi Mumbai Airport Inauguration : ३० तारखेला या विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.

Establishment of the post of District President in Parbhani
परभणीत काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कायम

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अधिक घोळ न घालता तातडीने जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांमधून…

BJP in dilemma due to arrest of two former corporators in Nashik
नाशिकमध्ये दोन माजी नगरसेवकांच्या अटकेमुळे भाजपची कोंडी प्रीमियम स्टोरी

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाची नाशिकची जबाबदारी खांद्यावर असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मागील आठवड्यात जळगाव येथील पक्ष मेळाव्यात कोणी…

Yogi Adityanath
Yogi Adityanath : योगी सरकारचा मोठा निर्णय; उत्तर प्रदेशात आता जातीवर आधारित रॅलींवर बंदी, FIR मध्येही जातीचा उल्लेख केला जाणार नाही

उत्तर प्रदेशात आता जातीवर आधारित रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच एफआयआर दाखल करतानाही आता एफआयआरमध्ये जातीचा उल्लेख केला जाणार…

ताज्या बातम्या