scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Kapil Patil Kathore Conflict Ends Thane BJP Unite For Badlapur Polls
कपिल पाटील, कथोरे एकत्र काम करणार ? पाटील यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती, उमेदवारांत समाधान…

Kapil Patil, Kisan Kathore : ठाणे जिल्हा ग्रामीण निवडणूक प्रमुखपदी कपिल पाटील यांची नियुक्ती झाल्याने, कुळगाव बदलापूर पालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने…

congress responds strongly bjp preparations dhule elections meeting strategy politics
भाजपच्या तयारीला काँग्रेसचा तोडीस तोड प्रतिसाद; धुळे काँग्रेसची महत्त्वाची बैठक…

माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धुळे जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी विधानसभा स्तरावर निरीक्षकांची नियुक्ती करून पक्षाने सक्रिय मोर्चेबांधणी…

Nitesh Rane Controversial Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027 Hindu Religious Identity Traders Shops
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात केवळ हिंदूंचीच… नितेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य…

Nitesh Rane Kumbh Mela : कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचा उत्सव असल्याने, या परिसरात दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींना जागा दिली जाणार नाही,…

Ex BJP corporator mrinal Pendse urged CM fadnavis to speed Kalu dam work
काळू धरण कामाला गती देण्याबरोबरच वाहतूक कोंडीसाठी उपायोजना करा; भाजपच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काळू धरणाच्या कामाला गती द्यावी तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे…

The resolution of '100% BJP' under the leadership of Anup Agarwal and Kunal Patil
मुख्यमंत्री फडणवीस-चव्हाण यांची रणनिती : धुळ्यात ‘शत प्रतिशत भाजप’चा संकल्प

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे.

Thackeray group's organizational expansion in Jalgaon; Appointment of three district chiefs for the first time
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) : जळगावमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रथमच तीन जिल्हाप्रमुख…!

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे तिन्ही घटक पक्ष जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडीतही शिवसेना (उद्धव…

anil deshmukh alleges 35000 fake votes by bjp workers from madhya pradesh in katol
मध्यप्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी काटोल मध्ये मतदान केले, ३५ हजार बनावट मतं, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर आता मतदार याद्यांतील अनियमिततेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि…

Competition will be fierce for the reserved post for Scheduled Tribe women
पिंपळनेर निवडणुक : राजकीय समीकरणे गुंतागुंतीची, मतदार उत्सुकतेच्या शिखरावर

फेब्रुवारी २०२४ मध्ये ’क’ वर्ग पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर…

Brazilian-Model-Larissa-Reacts-To-Rahul Gandhi
Brazilian Model : राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझीलच्या मॉडेलचा व्हिडीओ समोर; हरियाणात २२ वेळा मतदान केलं का? स्वत:च केला खुलासा, “अविश्वसनीय…”

ब्राझिलियन मॉडेलचं नाव राहुल गांधींनी घेतलं तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. लॅरिसाने व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. तसेच तिच्या फोटोबाबत…