scorecardresearch

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
MP Omraje Nimbalkar Rescues People Stuck In Rain Flood
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; खासदारांनी पुराच्या पाण्यात उतरून केलं बचावकार्य। Marathwada Rains

MP Omraje Nimbalkar Rescues People Stuck In Rain Flood: धाराशिवच्या परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वडनेर गावात आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून…

Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare
धनंजय मुंडेंना पुन्हा खुर्चीचे वेध; काम मागत तटकरेंना केली विनवणी, सुनील तटकरेंची सूचक प्रतिक्रिया

Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिकबरोबरच्या संबंधांमुळे धनंजय…

OBC reservation leader Navnath Waghmares car catches fire
Navnath Waghmare’s Car Burned: नवनाथ वाघमारेंची गाडी पेट्रोल टाकून जाळली, जालन्यात काय घडलं?

Navnath Waghmare Car Viral Video: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहरातील निलमनगर…

Prime Minister Narendra Modis big announcement before Navratri festival
Narendra Modi: देशात बचत उत्सव! नवरात्रोत्सवाआधी नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi: नवरात्रीचा उत्सव सुरु होतो आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देशात नवरात्रीचा उत्सव सुरु होत असतानाच नव्या बदलाना…

What did Chandrakant Patil say about Gopichand Padalkars controversial statements
Chandrakant Patil: “मी गोपीचंदचं समर्थन करत नाही, पण…”; चंद्रकांत पाटील म्हणाले?

Chandrakant Patil: भाजपचे नेते आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना शरद पवार गटाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत काही दिवसापूर्वी…

Chief Minister Devendra Fadnavis strongly criticized Uddhav Thackeray
Devendra Fadnavis: “यार ने ही लूट लिया…”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis: भारतीय जनता पक्षाचा आज मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव…

Pratap Sarnaik visits Swargate bus station pune
Pratap Sarnaik।प्रताप सरनाईकांची अचानक स्वारगेट स्थानकाला भेट, अधिकाऱ्यांना झापलं

प्रताप सरनाईक अचानक स्वारगेट स्थानकात पोहचले दरम्यान स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही त्यांची पुन्हा स्वारगेट आगारातच नेमणूक केली…

pune jm road jangli maharaj road history
Pune: पुण्यातील ‘त्या’ रस्त्यावर एकही खड्डा नाही;भ्रष्टाचारमुक्त कामाचा श्रेष्ठ नमुना

Pune: पुण्यातील जंगली महाराज रस्ता आता वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो.पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवघ्या २.५ किमींचा हा रस्ता जंगली महाराज मंदिरापासून…

Devendra Fadnavis gave a reaction on VP Election
Devendra Fadnavis on VP Election: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची किती मतं फुटली?

महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. संसदेमध्ये…

Radhakrishna Vikhe Patil has responded to Rohit Pawars allegations against the government over Maratha reservation
मराठा आरक्षणावरुन रोहित पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला विखेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Radhakrishna Vikhepatil: मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रोहित पवार…

OBC community leader Laxman Hake got angry as Manoj Jarange ended his hunger strike
laxman hake: “जीआरमधील शेवटचा पॅरेग्राफ…”; जरांगेंनी उपोषण सोडताच हाके संतापले

laxman hake: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरणासाठी मुंबईत ५ दिवस केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य…