scorecardresearch

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Minister Gulabrao Patil spoke at a program in Buldhana
Gulabrao Patil: “बुलढाण्यात सगळे कलाकार…”; गुलाबराव पाटील काय म्हणाले?

Gulabrao Patil: बुलढाणा येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण केले. “बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है”,…

What did Supriya Sule say about voting irregularities
Supriya Sule on Rahul Gandhi: दुबार मतदान थांबवणार कसं? सुप्रिया सुळेंचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मतचोरीबाबत धक्कादायक मुद्दा मांडला. एका परदेशातील व्यक्तीनं हरयाणात १०…

The women expressed their grief by crying in front of Sushma Andhare
Sushma andhare: महिलांनी रडत मांडली व्यथा; सुषमा अंधारे म्हणाल्या…

Sushma andhare: सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मांडला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला या सुषमा अंधारे यांच्यासमोर त्यांच्या…

Rahul Gandhi accused the BJP of stealing votes
Rahul Gandhi: भाजप नेत्याच्या ‘तो’ व्हिडीओ दाखवत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी आज (५ नोव्हेंबर) पुन्हा मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी…

Ravindra Dhangekar made serious allegations against Muralidhar Mohol
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर पुन्हा गंभीर आरोप; शेअर केली नवी पोस्ट

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला…

MNS chief Raj Thackeray criticizes State Election Commission
Raj Thackeray on State Election Commission:सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं, राज ठाकरेंचा आयोगावर संताप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील २४६ नगरपालिका…

Asim Sarodas license suspended for 3 months for remarks made at Shiv Sena UBT program
Asim Sarode on Licence Suspended: बार कौन्सिलच्या निर्णयाला असीम सरोदे देणार आव्हान

सार्वजनिक कार्यक्रमात न्यायपालिका, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी वकील असीम सरोदे यांची सनद महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेने निलंबित…

Kartiki Ekadashi the official Mahapuja of Vitthal Rukmini was performed by Eknath Shinde
Eknath Shinde: कार्तिकी एकादशीनिमित्त शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Eknath Shinde: कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने…

Gang war again in Pune Andekar gang kills one in broad daylight in Kondhwa
Pune Gang war।पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकले, रिक्षा चालकाला भरदिवसा कोयत्याने संपवलं

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धातून एकाची हत्या करण्यात आली आहे. कोंढवा भागात गणेश काळे या…

Sharad Pawars appeal from Satyacha Morcha
Sharad Pawar Satyacha Morcha: “…तर तुम्हाला आणि मला एक व्हावं लागेल”; शरद पवारांचं आवाहन

काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे…

Raj Thackeray criticized the government as well as the Election Commission
Raj Thackeray: “हे सगळे दुबार मतदार आहेत..”; राज ठाकरेंनी याद्यांचा गठ्ठाच दाखवला

Raj Thackeray: मविआ आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ आज (१ नोव्हेंबर) मुंबईत पार पडत आहे. या मोर्चात राज ठाकरेंनी भाषण केलं.…

ताज्या बातम्या