scorecardresearch

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
sanjay raut criticized devendra fadanvis over maharashtra politics
मिस्टर फडणवीस पुळका नको..; ठाकरेंच्या शेवटच्या रांगेचा प्रसंग चर्चेत!

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी…

Eknath Khadse gave a strong response to the allegations made by Rupali Chakankar
Eknath Khadse on Rupali Chakankar: रुपाली चाकणकर आता पोलीस अधिकारी झाल्या का? खडसेंचा सवाल

“रूपाली चाकणकर आता चेकाळल्या असून त्या निरर्थक आरोप करत आहेत. माझा जावई दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी…

Sudhir Mungantiwar criticized bjp government
Sudhir Mungatiwar on BJP: सुधीर मुनगंटीवार यांचा पक्षातील इनकमिंगबाबत भाजपालाच घरचा आहेर

“कोणत्याही पक्षात इनकमिंगसाठी विरोध असण्याचं काहीही कारण नाही. मात्र, हे देखील खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरमधील घरांसारखा बिना…

महादेवी हत्तिणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय शासनाचा नाही, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
महादेवी हत्तिणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय शासनाचा नाही, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

महादेवी हत्तिणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय शासनाचा नाही, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट | Devendra Fadnavis

Sanjay Raut criticized Nishikant Dubey over hindi bhasha controvercy
Sanjay Raut on Nishikant Dubey: असे अनेक दुबे आले नी गेले, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे…

sanjay raut criticized bjp government over pahalgan terror attack
Sanjay Raut on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला जाब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. बुधवारी राज्यसभेत पार पडलेल्या चर्चेत खासदार संजय राऊत यांना चार…

medha kulkarni criticized congress in monsoon session 2025
Medha Kulkarni: “काँग्रेसचा जावई म्हणाला…”; संसदेत काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

Medha Kulkarni: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत चर्चा सुरु असताना…

MP Sanjay Raut has criticized the government
Sanjay Raut on Mahayuti: दबावाचं राजकारण सुरू, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळत होते या प्रकरणी विधीमंडळाचा अहवाल समोर आला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी…

CM Devendra Fadanvis gave a speech in vardha
Devendra Fadnavis: “यामुळे अनेक पक्ष संपले”, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ध्यात विदर्भ भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ…

Eknath Khadse admitted that the photo with Prafulla Lodha is real
Eknath Khadse on Girish Mahajan: प्रफुल्ल लोढाबरोबरचा फोटो खरा, एकनाथ खडसेंनी केलं मान्य

मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांच्यात नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावरून जुंपली आहे. गिरीश…