scorecardresearch

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
What did Deputy Chief Minister Ajit Pawar say after the meeting in Mumbai
Ajit Pawar: मुंबईतील बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, संग्राम जगतापांबद्दल म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत…

Ravindra Dhangekar criticizes Chandrakant Patil over increasing crime in Pune
Ravindra Dhangekar in Pune: “भाजपाचे लोक माझ्यावर हल्ला करायला…”; धंगेकर काय म्हणाले?

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना थेट लक्ष्य केलं आहे. या संदर्भात…

mrunmayee deshpande manache shlok movie controversy marathi actors shares angry
Manache Shlok Movie Controversy: मनाचे श्लोक चित्रपटाचं प्रदर्शन तुर्तास स्थगित, नेमका वाद काय?

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा नवीन मराठी चित्रपट शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाच्या शीर्षकाचं समर्थ…

minister ram naidu gave speech in marathi bhasha at navi mumbai airport inaugration
Ram Naidu: मंत्री नायडूंचं मराठीत भाषण; देवेंद्र फडणवीसांकडून टाळ्यांचा कडकडाट

Ram Naidu: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. या…

Aditya Thackerays response to Prime Minister Narendra Modis criticism of Maha Vikas Aghadi
Aaditya Thackeray: मोदींचं मविआवर टीकास्त्र; आदित्य ठाकरे म्हणाले…

Aaditya Thackeray: मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मी केले होते. पण त्यानंतर काही काळासाठी वेगळे सरकार आले. त्यांनी ते काम थांबवले.…

Bihar Teacher Caught Without Ticket Argues With Rail TC
तिकीट नाही, पण घमंड प्रचंड! बिहारच्या शिक्षिकेचा टीसीसमोर धिंगाणा, नेटकरीही भडकले

Bihar Teacher Caught Without Ticket Argues With Rail TC: सध्या सोशल मीडियावर बिहारच्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.…

Kasturba Hospital Controversy
प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकल्याने वाद चिघळणार? कस्तुरबा रुग्णालय प्रकरणी मनसेची रोखठोक भूमिका

Kasturba Hospital Controversy: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा…

Gautami Patils first reaction to Chandrakant Patils comment
“दादांना जे योग्य वाटलं..”, चंद्रकांत पाटलांच्या कमेंटवर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया

“दादांना जे योग्य वाटलं..”, चंद्रकांत पाटलांच्या कमेंटवर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया

Pune Accident Case Gautami Patil First Reaction
Pune Accident: गौतमी पाटीलने जखमी रिक्षाचालकांच्या लेकीच्या आरोपाला दिलं उत्तर, “मी मदत दिली पण..”

Pune Accident Case Gautami Patil First Reaction: पुण्यातील अपघात प्रकरणात नृत्यांगना गौतमी पाटील हिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून धारेवर धरलं जात…

Chief Minister Devendra Fadnavis big announcement to help dryland farmers
Devendra Fadnavis: “कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 हेक्टरी मदत..”; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे.…

Who Is Rakesh Kishor who Threw Shoes At CJI B R Gavai
सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावणारे राकेश किशोर आहेत कोण? ७१वर्षीय वकिलांचे पूर्ण रेकॉर्ड्स पाहा

Who Is Rakesh Kishor who Threw Shoes At CJI B. R. Gavai: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) सर्वोच्च…