scorecardresearch

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
RSS celebrated centenary on September 27 with procession at gandhi statue Variety Chowk Nagpur
‘बापूंचे हत्यारे…’ गांधी पुतळ्यासमोरून संघाच्या पथसंचलनावर पणतू तुषार गांधी यांचा थेट हल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तारखेनुसार शतक महोत्सव २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपूरच्या वेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोरून स्वयंसेवकांनी पथसंचलन…

Harshvardhan Sapkal (1)
संघाने महात्मा गांधींचे विचार स्वीकारवे, पुढे गांधी,मागे नथुराम असे नको -सपकाळ

सरसंघचालकांनी महात्मा गांधीचे विचार स्वीकारावे नाही तर पुढे गांधी आणि मागे नथुराम असे असायला नको,असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

senior Sarvodaya activist Vijay P Diwan
सर्वोदय, काँग्रेस सहोदरच! सर्वोदयाचे कार्यकर्ते विजय दिवाण त्यांच्याकडून भूमिका स्पष्ट

‘सर्वोदय व काँग्रेस ही महात्मा गांधींची वैचारिक अपत्ये आहेत. त्यामुळे त्या दोघांचे नाते हे सहोदरांचे आहे’ – असे स्पष्ट मत…

Narendra Modi BSNL 4G inauguration
अखेर ‘बीएसएनल’चेही ४जी ‘स्वदेशी’ नेटवर्कचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

‘बीएसएनल’च्या ‘स्वदेशी ४जी’मुळे दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ‘बीएसएनल’च्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून ४जी सेवेचे लोकार्पण…

congress leader ramesh chennithala
“निवडणूक आयोग भाजपचे काम करतो”, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा आरोप

काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस भवन येथे घेण्यात आली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Harshvardhan Sapkal (1)
आघाडीबाबच्या निर्णयाचे स्थानिक पातळीवरील नेत्यांना स्वातंत्र्य; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट की स्थानिक स्वराज्य निवडणुकांत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांना घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

rss
संघाची शताब्दी अन तुषार गांधींच्या सत्याग्रह यात्रेचा समारोप एकाच दिवशी

संविधान सत्याग्रह पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रमात झाला.याच दिवशी आरएसएसचा शताब्दी दिन, गांधी जयंती आणि दसरा असे तीन…

Congress tushar gandhi
तुषार गांधींच्या संविधान सत्याग्रह यात्रेपूर्वी काँग्रेसची मशाल यात्रा

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान होणाऱ्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नागपुरात…

Competition among political leaders over help for flood victims in Kolhapur
कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा प्रीमियम स्टोरी

यावर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. लाखो पूरग्रस्तांचे दैनंदिन जगणे विस्कळीत झाले आहे.

rss prayer emerged on London band
लंडनच्या सुप्रसिद्ध बँडवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना… संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पणात…

संघाच्या प्रार्थनेची ध्वनिचित्रफीत लोकार्पण सोहळा शनिवारी (२७ सप्टेंबर) नागपुरात थाटात झाला. यावेळी लंडनच्या सुप्रसिद्ध बँडवर संघाची प्रार्थना बसवली गेल्याचे पुढे…

Dombivli congress Mama Pagare pm Modi Defamation case police FIR bjp
पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ प्रतिमेमुळे काँग्रेसचे मामा पगारे अडचणीत; भाजपची थेट पोलीस ठाण्यात धाव…

Mama Pagare : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडीच्या वेशातील बदनामीकारक प्रतिमा समाज माध्यमांत प्रसारित केल्याबद्दल डोंबिवलीतील काँग्रेस नेते मामा…

Congress alleges Nitin Gadkari over fuel ethanol blending
नितीन गडकरींच्या पुत्रप्रेमापोटी इंधनात इथेनॉल मिश्रण, इंजिन खराब होत असल्याने वाहनधारकांना फटका; काँग्रेसचा आरोप

केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये २० इथेनॉलचे मिश्रण सुरू केले. या मिश्रित इंधनाच्या वापरामुळे मार्च २०२३ च्या आधीच्या वाहनांचे इंजित खराब होत…

ताज्या बातम्या