scorecardresearch

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Congress Tiranga Yatra updates news in marathi
जळगाव जिल्ह्यात महायुतीनंतर काँग्रेसची तिरंगा यात्रा

काँग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बुधवारी फैजपूरमध्ये तिरंगा वीर स्मरण यात्रा काढून कुठेच कमी नसल्याचे दाखवून…

There is talk here that two former Congress MLAs from Parbhani and Jalna districts may join BJP in the presence of Amit Shah
काँग्रेस माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यातील कार्यक्रमांची तयारी सुरू

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका माजी आमदाराच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे; पण भाजपाच्या वाटेवर समजले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर.…

Vijay Wadettiwar remark on bjp minister Vijay Shah
मंत्री शाहांवर टीका करताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, म्हणाले…

सैनिकांच्या सन्मानार्थ बोलण्याऐवजी भाजपचा हरामखोर व नालायक मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफीया कुरेशी यांच्याबाबत अपमानास्पद टिपणी केली.

Ex Minister Siddharam Mhetre quit Congress and joined Shiv Sena from akkalkot taluka today
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेसचा राजीनामा; सोलापुरात काँग्रेसला धक्का; शिवसेनेत ३१ मे रोजी प्रवेश

अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला…

Congress chief Harshwardhan Sapkal news in marathi
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ट्रॅक्टरवर… काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक

मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Congress MP Jairam Ramesh
“महिना उलटला तरी पहलगामचे दहशतवादी मोकाट”, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Congress MP Jairam Ramesh : काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्याला उद्या एक महिना होईल, मात्र हल्लेखोर कुठे आहेत?”

mallikarjun kharge
“मोहम्मद अली जिनांना क्लीन चिट कोणी दिली? पकिस्तानचं कौतुक…”, काँग्रेसचा भाजपाला चिमटा

Congress leader Jairam Ramesh : काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “पहलगाममधील दहशतवादी हल्ला होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र,…

शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Operation Sindoor : शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय?

Shashi Tharoor Articles on Terrorist Attack : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळातील शशी थरूर यांची नियुक्तीवर काँग्रेसच्या एका गटाचा आक्षेप…

Congress Leader Sangeeta Tiwari
“आंदोलन, प्रचाराला महिला हव्यात, पण…”, काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप; राहुल गांधींसह सर्व ज्येष्ठ नेत्यांचं नाव घेत म्हणाल्या…

काँग्रेसमधील महिला नेत्या संगीता तिवारी या काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. महिला कार्यालय बंद केल्याच्या कारणावरून त्यांनी हा निर्णय घेतला…

Congress tries to embarrass Union External Affairs Minister S Jaishankar
काँग्रेसकडून परराष्ट्रमंत्र्यांच्या कोंडीचा प्रयत्न

पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिल्याच्या विधानावरून काँग्रेसने केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारीही चालू ठेवला.

nashik congress news in marathi
काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली

भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले…

गुजरातमधील ढासळत्या काँग्रेस नेतृत्वाला कारणीभूत नेमकं काय?

राहुल गांधी यांनी मार्चमध्ये अहमदाबादच्या दौऱ्यादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस नेत्यांचा एक गट भाजपाशी संगनमत करीत…

ताज्या बातम्या