scorecardresearch

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Rajesh Kshirsagar Satej Patil Kalammawadi Water War kolhapur
काळम्मावाडी योजनेवरून राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटलांवर पलटवार; श्रेय घेता, मग जबाबदारी का झटकता…

Rajesh Kshirsagar, Satej Patil : महायुती विकासाची कामे करत असल्याने पोटशूळ उठलेल्या सतेज पाटील यांच्याकडे आता केवळ टीका करणे हेच…

Mahavikas Aghadi will show unity at Shri Tuljabhavani Temple in Thane
ठाण्यात महाविकास आघाडीचा दिपोत्सव… श्री तुळजाभवानी मंदीरात दाखविणार एकीचे दर्शन

ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्याच्या नगरविकास विभागांर्तगत…

sanjay raut Letter MNS Alliance Raj uddhav Thackeray confusion in mahavikas aghadi harshvardhan Sapkal
मनसेच्या सहभागावरील संजय राऊतांच्या कथित पत्रामुळे आघाडीत संभ्रम…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे काँग्रेस संभ्रमात असतानाच, संजय राऊत यांच्या कथित पत्रामुळे महाविकास आघाडीत…

congress questions sudden voter surge in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या चार दिवसांत ६ लाख मते कशी वाढली? काँग्रेसचा आयोगाला सवाल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या चार दिवसांत ६ लाख ५५…

Maharashtra politics today
Top Political News : काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश; बिहारमध्ये महाआघाडीत फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, दिवसभरात काय घडलं?

Top Political News Maharashtra : महाराष्ट्र अन् देशातील पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

political shift Karad Congress Shiv Sena leaders join BJP under Atul Bhosale Ravindra Chavan
कराड : काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी भाजपात…..

काँग्रेससह शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांची ही मोठी खेळी यशस्वी झाली…

Congress claims BJP office bearer's name in double constituency in Mira-Bhayander
मिरा-भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे दुहेरी मतदार संघात नाव; लोकसभा निवडणुकीनंतर हा घोळ केल्याचा काँग्रेसचा दावा

मिरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी केल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत आहे.

Bihar election 2025 RJLP Out Of Mahagathbandhan Umbrella
बिहारमध्ये महाआघाडीत फूट, ‘या’ पक्षाने सोडली साथ; कारण काय?

Bihar election 2025 महाआघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

political families family active for Zilla Parishad president post in Kolhapur print politics news
कोल्हापूरमध्ये सत्तेसाठी सर्व मातब्बर घराणी सक्रिय

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित राहिले आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी गेली सात आठ वर्ष तयारीत असलेल्या ग्रामीण भागातील…

congress moderate approach rss strategy Harshvardhan sapkal leadership maharashtra politics
लोकजागर : हर्षातले ‘कडवे’ बोल!

सततच्या पराभवाने सध्या काँग्रेस पक्ष चाचपडतोय. कशासाठी तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. सुदैवाने या पक्षाला सध्या चांगला प्रदेशाध्यक्ष लाभलाय. बंटी ऊर्फ…

swati pachundkar joins bjp congress criticizes calls washing machine ranjangaon land scam
भाजपचा ‘वॉशिंग मशीन’ ते ‘धोबी घाट’ प्रवास – काँग्रेसचा आरोप

रांजणगाव येथील महागणपती देवस्थानच्या परिसरात झालेल्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून पाचुंदकर दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात आहे

kerala Anandu Ajith Suicide RSS sexual Allegations Mumbai Youth Congress Protest demands action
रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे आंदोलन

केरळमधील आयटी इंजिनीअर आनंदू अजि यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषणाचा आरोप करून आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने दादर येथे…