scorecardresearch

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Congress state president Harshvardhan Sapkal asserted
दाभडी ते आर्णी काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा; शेतकऱ्यांचा लढा दिल्लीपर्यंत नेणार -सपकाळ

भाजपची सत्ता आल्यानंतर आज ११ वर्षानंतरही महाराष्ट्रासह देशातील शेतकरी हताश आहेत. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले.

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात विशेष अधिवेशनासाठी सरकार उत्सुक नाही, काय असेल विरोधकांची पुढची रणनीती?

काँग्रेसने विशेष सत्रासाठी विरोधी पक्षांकडून स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. त्यांनी सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’पासून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन संरक्षण तयारी आणि…

The district is focused on the general elections of Gondia District Central Cooperative Bank
गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक ; सत्तेची किल्ली ८९४ मतदारांच्या हाती, सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र..

बँकेच्या सत्तेची किल्ली आपल्याकडे यावी, या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पुढारीही कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पॅनलने अद्यापही अधिकृत उमेदवारांचे पत्ते…

Congress organizes farmers self esteem march in Dabhadi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही.

BJP concerns about Congress kisan Samman Yatra
काँग्रेसच्या शेतकरी यात्रेची भाजपला भीती का?

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आजपासून यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी या गावातून शेतकरी सन्मान यात्रेला सुरूवात होत आहे.

Siddharam Mhetre current role in Shinde Shiv Sena
शिवसेना प्रवेशानंतरही सिद्धराम म्हेत्रे यांच्यासमोरील अडचणी कायम राहणार ?

सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटात म्हेत्रे यांनी प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर सूत जमणे कठीण असल्याचे मानले जाते. तसे…

'आप'-काँग्रेसच्या भांडणात भाजपाचा होणार फायदा? केजरीवालांचं 'ते' स्वप्न भंगणार? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
‘आप’-काँग्रेसच्या भांडणात भाजपाचा होणार फायदा? केजरीवालांचं ‘ते’ स्वप्न भंगणार?

AAP vs Congress Political News : लुधियाना विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस व आम आदमी पार्टीने एकमेकांचे पाय खेचण्यास सुरुवात केली आहे,…

“देशभक्त असणं…”, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा पक्षाला सवाल; भाजपानेही दिली प्रतिक्रिया

Salman Khurshid on Congress: काँग्रेसकडून वारंवार टीका केली जात असताना सलमान खुर्शीद यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या या…

Congress leader Shivajirao Moghe on  anti farmer policies
मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केलेले दाभाडी काँग्रेसने पुन्हा आणले चर्चेत !

गरज नसताना शेतमालावर निर्यातबंदी करणे व आयात वाढवून शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान रचण्यात आले. अर्थसंकल्पात शेतीवरील खर्चात कपात करण्यात आली.…

कोण होते ललित नारायण मिश्रा? ५० वर्षानंतर पुन्हा होणार माजी मंत्र्याच्या हत्येची चौकशी? (फोटो सौजन्य पीटीआय)
माजी केंद्रीय मंत्र्याच्या हत्येची ५० वर्षानंतर पुन्हा होणार चौकशी? कोण होते ललित नारायण मिश्रा?

Who killed Lalit Narayan Mishra : जानेवारी १९७५ मध्ये बिहारच्या समस्तीपूर येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ललित नारायण…

ताज्या बातम्या