scorecardresearch

काँग्रेस Videos

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
सिक्रेट ट्रिप, करोडोंचा खर्च… भाजपकडून राहुल गांधींवर सर्वात मोठा आरोप | AM2
सिक्रेट ट्रिप, करोडोंचा खर्च… भाजपकडून राहुल गांधींवर सर्वात मोठा आरोप | AM2

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचा हिशोब मांडत टीका केली. पंतप्रधान मोदींनी इंधन बचत, सोनं खरेदी…

parth pawar criticized congress party nana patole gave a reaction on baramati bypoll election
Nana Patole: पार्थ पवार यांची काँग्रेसवर टीका; नाना पटोले म्हणाले…

Nana Patole: काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काँग्रेसच्या या निर्णयावर पार्थ पवार यांनी…

Bihar Chief Minister Nitish Kumar pulls down woman hijab at event Congress and RJD slams vile act
Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांच्या व्हिडीओवरून राजकीय वादंग, काँग्रेसकडून राजनाम्याची मागणी

Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांच्या व्हिडीओवरून राजकीय वादंग, काँग्रेसकडून राजनाम्याची मागणी

narendra modi criticized congress over bihar election 2025
PM Modi नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका “मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस” राष्ट्रीय एकतेसाठी धोका !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्ली इथे सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानाला संबोधित केले. दरम्यान त्यांनी शहरी नक्षलवाद आणि ‘मुस्लिम लीग…

Bihar election results have been announced and Ambadas Danve has criticized the Congress party
Ambadas Danve: बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होताच दानवेंची काँग्रेसवर टीका; म्हणाले…

Ambadas Danve: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपा,…

MNS proposes alliance to Congress harshavardhan sapkal gave a reaction
“युतीसाठी मनसेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला तर?”, पत्रकाराने प्रश्न विचारताच सपकाळ काय म्हणाले?

Harshwardhan Sapkal: “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसाठी मनसेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला तर तुमची भूमिका काय असेल?” असा प्रश्न पत्रकारांनी…

Ajit Pawar gave a reaction on the vote theft issue
Ajit Pawar on Vote Choti: ‘व्होटचोरी’ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

काँग्रेससह इंडिया आघाडीने उचलून धरलेल्या व्होट चोरीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. सगळीकडे मताची संख्या वाढत असते…

medha kulkarni criticized congress in monsoon session 2025
Medha Kulkarni: “काँग्रेसचा जावई म्हणाला…”; संसदेत काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

Medha Kulkarni: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत चर्चा सुरु असताना…

BJP MP Medha Kulkarni demands naming of Pune railway station Congress leader Prashant Jagtap reacts
Medha Kulkarni: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या मागणी, प्रशांत जगताप काय म्हणाले?

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.…

Prakash Ambedkar mentions Congress in Pune indtayani river bridge collapsed accident case
Prakash Ambedkar on Pune Bridge: पुणे पूल दुर्घटनेप्रकरणी प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसचा उल्लेख

पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हाच्या पालकमंत्र्यांसह अधिकारी, काॅन्ट्रॅक्टर सगळ्यांना अटक करा.…

nana patole made a big statement over operation sindoor pahalgam attack
Nana Patole: नाना पटोलेंनं ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळणार?

Nana Patole: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक वक्तव्य केलं आहे. “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्पुटरवरील लहान मुलांचा गेम”,…

Maharashtra CM Devendra Fadnavis Criticised on rahul Gandhis Statement About Ladki bahin yojna
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: राहुल गांधींकडून लाडक्या बहिणींचा अपमान – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लेख लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेल्या…

ताज्या बातम्या