scorecardresearch

मनसे News

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
drone flights in sensitive thane areas spark safety concerns
संवेदनशील भागात ड्रोनची वाढती उड्डाणे ? सामाजिक संघटनांकडून कारवाई बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील भागांत ड्रोन उडवण्यावर बंदी असूनही त्याचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी सामाजिक संघटनांनी…

Wet Drought Maharashtra government should not advertise farmers sorrow raj thackeray
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जाहिरातबाजी… ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; राज ठाकरेंचा शिंदे यांना टोला!

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

BJP leaders turned their backs on Vaibhav Khedekar's entry into the party
वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ; दोनदा पक्ष प्रवेश हुकल्याने खेडकर यांच्यासह समर्थक कार्यकर्ते नाराज

रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांची काही दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वैभव खेडेकर यांचे भाजप…

Marathi language mandate, Thane school, Maharashtra government order Marathi, Marathi language enforcement, school board language rules,
सात दिवसांत शाळांचे फलक मराठीत करा, नाहीतर तीव्र आंदोलन.. मनसेचा ठाणे महापालिकेला इशारा

सात दिवसांत शाळांचे फलक मराठीत करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिंद्रकर ठाणे महापालिकेला दिला आहे.

high court questions public interest in plea against raj thackeray mns mumbai
मराठी अमराठी वाद! मनसेविरोधातील याचिकेत जनहित काय ? याचिकेच्या योग्यतेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह…

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना थेट विचारले की, या प्रकरणात जनहित काय आहे, कारण हे प्रकरण एका राजकीय पक्षाचा नेता आणि कार्यकर्त्यांविरोधातील आहे.

ullhasnagar child assaulted in school mns protests with vandalism
‘त्या’ शाळेची मनसेकडून तोडफोड… तीन वर्षाच्या बालकाला झालेली शाळेत मारहाण…

उल्हासनगरमधील एका खासगी बालवाडीत तीन वर्षीय बालकाला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक देऊन तोडफोड केली आहे.

Traffic congestion is a big problem in Thane MNS holds long march
वाहतूक कोंडी थांबली नाही तर ठाण्यात नेपाळसारखी परिस्थिती होईल; मनसे नेते अविनाश जाधव यांचे मत

ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मनसेच्यावतीने शनिवारी लाँग मार्च काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

MNS party aggressive over traffic congestion in Thane
ठाण्यातील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक; मनसे नेते अविनाश जाधव यांचा जीआरविरोधात इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अलीकडेच आलेल्या तीन जीआरचा…

MNS workers protested at Khanivade toll plaza on saturday
महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी समस्येवर मनसे आक्रमक; खानिवडे टोलनाक्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन

गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीत १६ महिन्याच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत…

MNS Sandeep Deshpande Induri Chaat in Dadar
“स्वतःच्या हॉटेलमधील पदार्थ व आचारी परप्रांतीय, अन् निघालेत…”, ‘इंदूरी चाट’वरून भाजपाचा देशपांडेंना टोला; मनसेचं चोख प्रत्युत्तर

Sandeep Deshpande Induri Chaat : संदीप देशपांडे यांनी नुकतंच दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या नावाने एक उपहारगृह सुरू…

raj thackeray advises focus on voter list ambernath
राज ठाकरेंनी दिला मोलाचा सल्ला; आत्तापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा…

राहुल गांधींच्या आरोपांनंतर राज ठाकरे यांनीही बोगस मतदारांचा मुद्दा उचलून धरत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

raj-thackarey
पक्षफुटीनंतर राज ठाकरे आज या शहरात अंबरनाथसह, कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

पक्षातील फुटीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये येणार आहेत. गेल्या महिन्यात अंबरनाथ शहरातील शहर अध्यक्षांसह माजी…

ताज्या बातम्या