scorecardresearch

शिवसेना News

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Shivsena mla pravin swami hosts Pratap sarnaik raising political speculation in dharashiv
शिंदेंच्या मंत्र्यांचा ठाकरेंच्या आमदाराकडून पाहुणचार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार व परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाकरे सेनेचे आमदार असलेल्या प्रवीण स्वामी यांनी घरी…

Mahayuti shivsena bjp ncp to Contest All Upcoming Local Elections in Ratnagiri
रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार; शिवसेना शिंदे गटाचा निर्णय

राज्य पातळीवरील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांची चर्चा

thane stations rs 949 crore for modernization under amrit bharat station scheme
ठाणे रेल्वे स्थानक आधुनिकीकरणाचा अद्याप निर्णय नाही.., ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.या प्रस्तावावर…

Anil Parab targets Minister Yogesh Kadam over sand mining in Jagbudi river
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदममांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा कोर्टात जाईन; ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा इशारा

जगबुडी नदीतील ही वाळू या योगीता योगीता दंत महाविद्यालयाजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले…

Political parties offer free st bus msrtc bus service to Konkan for Ganpati festival
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना हाक…

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.

Sanjay Gaikwad beaten up loksatta news
आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरण; दाक्षिणात्य समाजाची माफी मागावी – तुलुनाडू शेट्टी समाजाची मागणी

काही दिवसांपूर्वी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातून गायकवाड यांनी जेवण मागवले होते.

Distribution of Rs 85 lakhs without work in Kolhapur Municipal Corporation; Shiv Sena alleges
कोल्हापूर महानगरपालिकेत कामाशिवाय ८५ लाखांच्या रकमेचे वाटप; शिवसेनेचा आरोप, चौकशीचा आदेश

कामाच्या या अनियमिततेविषयी महापालिकेच्या प्रशासक यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी चौकशीचा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP tehsil president Dadasaheb Hubale demanded an inquiry from the Atpadi Tehsildar
सुहास बाबर यांच्या भ्रमणध्वनीवरील संभाषणाच्या चौकशीची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, करगणी येथे अल्पवयीन मुलीने टोळक्याच्या त्रासाने आत्महत्या केली. या प्रकरणातील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न राजकीय हस्तक्षेपातून…

काटई-निळजे पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या पुलावर गुणवत्तेचा खून, या कामाच्या पापाचे नाथ कोण?…

मनसे नेते राजू पाटील यांनी पुलावरील कामाच्या गुणवत्तेचा खून झालाच आहे. पण या पापाचे नाथ कोण आहेत? असा सवाल केला…

sunil tatkare about mahayuti strategy for local body elections Dhananjay munde position remains intact in ncp
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘महायुती’तून सामोरे जाणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी…

eknath shinde slams uddhav Thackeray over party defections uses nero analogy criticize in thane event
पक्षातील लोक सोडून जाताना, नेता आनंद व्यक्त करतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवित होता अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

ताज्या बातम्या