-
बॉलिवूडमध्ये जोडया बनतात आणि तुटतात. पण फार कमी अशी प्रेम प्रकरणे असतात, जी विवाहापर्यंत पोहोचतात. अजय देवगण आणि काजोल यांच नातं सुद्धा असचं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – काजोल फेसबुक)
-
अजय आणि काजोलच्या लग्नाला आता २१ वर्ष झाली. १९९९ साली दोघे विवाहबद्ध झाले. इतक्यावर्षात कधीही त्यांच्यात बेबनाव झाल्याचं समोर आलं नाही. बॉलिवूडमध्ये अजय-काजोलकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.
-
१९९५ साली सर्वप्रथम हलचलच्या सेटवर दोघांची ओळख झाली. अजयला सुरुवातीला काजोल अहंकारी आणि खूप बडबडी वाटली होती. तिला दुसऱ्यांदा भेटण्यासाठी तो फारसा इच्छुक नव्हता. इंडिया टुडेने हे म्हटले आहे.
-
काजोलला सुद्धा सुरुवातीला अजय शांत राहणारा, कोणात न मिसळणारा, अलिप्त राहणारा मुलगा वाटला होता.
-
चित्रीकरण सुरु असताना एका दृश्याच्यावेळी अजय आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो याची जाणीव काजोलला झाली.
-
हलचलच्या सेटवर अजय-काजोलची ओळख झाली पण लगेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत. पहिली दोन वर्ष त्यांच्यात फक्त मैत्री होती
-
दोन वर्षानंतर आम्ही एकत्र येऊ शकतो का? या दृष्टीने परस्पराबद्दल विचार सुरु केला. काजोलने एका चॅट शो मध्ये हे सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
-
काजोल तिच्या खासगी आयुष्याबद्दल अजय बरोबर बोलायची, त्याच्याकडून सल्ला घ्यायची त्यातून त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.
-
"आधी आम्ही मित्र झालो. परस्परांचा विचार करतोय याची आम्हाला काही काळाने जाणीव झाली. त्यानंतर एक दिवस आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला" असे अजयने सांगितले.
-
"मला माझ्या लग्नाचा गाजावाजा नको होता. त्यामुळे मी माझ्या घराच्या गच्चीवर अत्यंत साध्यापद्धतीने विवाह केला" असे अजयने मिड डे ला सांगितले.

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल