-
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.
-
अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांची मने जिंकली आहेत.
-
तिचे लाखो चाहते आहेत.
-
सध्या मयूरी स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या हिंदी मालिकेत काम करताना दिसत आहे.
-
या मालिकेतील तिची मालिनी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे
-
मयूरीचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने गेल्या वर्षी, जुलै २०२०मध्ये आत्महत्या केली.
-
पण आता दुःख पचवून मयुरी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आहे.
-
दरम्यान, मयूरीने काही दिवसांपूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
-
'२०२० हे वर्ष माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबीयांसाठी खूप कठिण होतं. आशुतोष आम्हाला सोडून कायमचा निघून गेला. पण यातून बाहेर पडणे देखील गरजेचे आहे' असे मयूरी म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, 'माझे आशुतोषवर प्रेम आहे आणि ते तसेच राहिल. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.'
-
मयूरीला सोशल मीडियावर सतत मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. जर भविष्यात मुलं हवी असतील तर? असा प्रश्न तिला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.
-
त्यावर तिने 'जर तुम्हाला मुलं हवी असतील तर अनेक पर्याय आहेत. तुम्ही दत्तक घेऊ शकता. आणखी देखील खूप पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही लग्न करण्याची आवश्यकता नाही' असे उत्तर दिले.
-
लवकरच मयूरीचे 'डिअर आजो' हे नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
तीन वर्षांपूर्वी मयूरीने हे नाटक लिहिले होते.
-
आता लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली