-
भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने कांस्यपदाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला धूळ चारली.
-
भारताच्या या विजयासोबतच देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जातोय.
-
मैदानातील खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या विजयाचा आनंद साजरा केलाय. अगदी शाहरुख खान, अक्षय कुमार. तापसी पन्नूसारख्या बड्या कलाकारांनी यासंदर्भातील पोस्ट केल्या आहेत. पाहूयात कोण काय म्हणालंय…
-
अभिनेता सनी देओलने भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
-
कुणाल कपूरने भारतीय संघाचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात.
-
अभिनेता राहुल बोसनेही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
-
अभिनेता अभिषेक बच्चनने कांस्यपदक मिळाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करताना हे खेळाडू कांस्यपदकाच्या लकाकीप्रमाणे चमकत असल्याचं म्हटलंय.
-
दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही फोटो पोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने या विजयाची इतिहासामध्ये नोंद होईल असं म्हणत संघाचं अभिनंदन केलंय.
-
अभिनेत्री निम्रत कौरनेही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्यात.
-
भारतीय संघाचे अभिनंदन असं चक दे इंडिया फेम शाहरुख खान ट्विटरवरुन म्हणाला आहे.
-
तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने अभिनंदन करतानाच सामना फारच रंजक झाल्याचं सांगत संघाने भन्नाट कमबॅक केल्याचं म्हटलंय.
-
तापसीनेही ट्विटरवरुन भारताला कांस्यपदक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
-
अभिनेता अनिल कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट कोट करुन रिट्विट करत आजचा हा दिवस पहायला माझे वडील हवे होते असं म्हटलं आहे.
-
अनेक कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीज ठेवत भारतीय संघाचं अभिनंदन केलंय.
-
उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय.
-
सामना जिंकल्यानंतर भारताच्या सर्वच खेळाडूंनी एकमेकांना अगदी कडकडून मिठ्या मारल्या.
-
१-३ ने मागे असणाऱ्या भारतीय संघाने दमदार कमबॅक करत ५-४ ने सामना जिंकला.
-
सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं.
-
भारताने दमदार खेळ करत आणि अगदी शेवटच्या क्षमापर्यंत धीर न सोडता इतिहास घडवला.
-
संघातील जवळजवळ सर्वच खेळाडूंनी श्रीजेशला मिठी मारत त्याने शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवल्याबद्दल आनंमद व्यक्त केला.
-
भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं अन् मैदानामध्ये एकाच वेळी आनंद आणि निराशा असं चित्र पहायला मिळालं.
-
मात्र भारतीय संघाने जिंकल्याचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना धीर दिल्याचंही पहायला मिळालं.
-
अनेक खेळाडूंनी सामना जिंकल्याचं समजल्यानंतर पेनल्टी यशस्वीपणे अढवणाऱ्या श्रीजेशला मिठ्या मारत आनंद साजरा केला.
-
एकीकडे भारतीय खेळाडू आनंद साजरा करत असतानाच दुसरीकडे जर्मन खेळाडू मात्र निराश होऊन डोकं धरुन बसल्याचं पहायला मिळालं. मात्र भारतीय खेळाडूंनी त्यांना धीर दिला.
-
अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं.
-
भारताच्या अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचं चित्र पहायाला मिळालं.
-
अगदी सपोर्टींग स्टाफचीही अनेकांनी अगदी कडकडून मिठी मारत भेट घेतली.
-
मैदानातच सेल्फी काढण्यासही सुरुवात झाल्याचं पहायला मिळालं. (सर्व फोटो : ट्विटर आणि सोनी लिव्हवरुन साभार)
-
आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.
-
याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला