-
बिग बॉस ओटीटीमुळे प्रसिद्धी मिळालेली उर्फी जावेद सतत चर्चेत असते.
-
ती तिच्या अनोख्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते.
-
उर्फी खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
-
ती ‘अनुपमा’ मालिकेतील अभिनेता पारस कलनावतला डेट करत होती.
-
पण जवळपास ९ महिन्यांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
-
आता उर्फीने ब्रेकअप का झाला या मागचे कारण सांगितले आहे.
-
नुकतीच उर्फीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कारण सांगितले आहे.
-
‘मी त्याला रिलेशनशीप नाही म्हणणार. ती लहान वयात केलेली चूक होती. मी रिलेशनच्या पहिल्या महिन्यातच ब्रेकअप करणार होते’ असे उर्फी म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, ‘तो खूप लहान होता आणि त्याला माझी खूप काळजी होती. त्याने माझ्या नावाचे तिन ट्यॅटू काढले होते. त्याने अनेकदा मला समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण असे कोण करते? मला त्याच्याकडे जायचे नव्हते. त्याने त्याच्या संपूर्ण शरीरावर जरी ट्यॅटू काढले असते तरी मी परत गेले नसते.’
-
ब्रेकअपनंतर पारसने तिला अनेकदा फोन केले पण तिने उचलले नाहीत असे देखील उर्फीने सांगितले.
-
‘मी या सर्व गोष्टींचा आनंद घेते होते. काही दिवसांनंतर तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये होता’ असे उर्फी म्हणाली.
-
या मुलाखतीमध्ये तिला पुन्हा पारससोबत काम करण्याची संधी मिळाली तर करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावर उत्तर देत ती म्हणाली, ‘तो माझ्यासोबत काम करणार नाही. आम्ही अनुपमा मालिकेत एकत्र काम करणार होतो. त्याने टीमला मला कास्ट करु नका असे सांगितले. आम्ही एकत्र काम करु नये असे त्याच्या गर्लफ्रेंडला वाटते.’
-
उर्फी आणि पारस २०१७मध्ये रिलेशनशीपमध्ये होते.
-
‘मेरी दुर्गा’ मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. पण त्या दोघांचा ब्रेकअप झाला.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस