-
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम.
-
कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीय.
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाच्या हजेरीत केळवण पार पडल्यानंतर आता हळदीसाठीही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत.
-
शशांक अपूर्वाच्या हळदीला वैशाली सामंत, आदर्श शिंदे आणि ‘फुलाला सुगंध माती’चा मालिकेतील कीर्ती खास हजेरी लावणार आहेत.
-
हळद म्हण्टलं की नाचगाणं हे ओघाने आलंच.
-
वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या सुपरहिट गाण्याने हळदीच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.
-
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा.
-
दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम.
-
कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे.
-
लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं.
-
एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case