-
मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
“हे संवाद ऐकून आमच्या अंगावर काटा आला” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकवर्गाकडून दिल्या जात आहेत.
-
‘सुभेदार’ चित्रपटातील अंगावर शहारा आणणारे जाणून घेऊया…
-
“आमच्या लाडक्या कोंढण्यावरचे मुघलांचे निशाण…” राजमाता जिजाऊंच्या या वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते.
-
“पुढच्या एका मासात जर कोंढाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार…” हा संवाद छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंना उद्देशून म्हणतात.
-
“राजं म्या शबूत देतो तुम्हासनी… इथल्या मातीचा कणं अन् कणं स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसरेच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंबबी गळंल…जय भवानी!” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाया लागल्या तरी चालतील… पण, आऊसायबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठणाला लागायलाचं हवं” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“५०० गडी लयं झालं…” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“कोंढाण्याचं पान म्याचं उचलणार!” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“राजं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं…” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही” महाराज हे तानाजीरावांना उद्देशून म्हणतात.
-
“म्या गेलो तर, शेकडो तानाजी भेटत्याल…पण, समध्यांना मार्ग दाखवायला एक शिवाजी राजं हवं ना…” तानाजी मालुसरे यांच्या या संवादाने ट्रेलरचा शेवट होतो.

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?