









ज्याची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रींमत ह्रदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे,
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे

