-
Lagnanantar Hoilach Prem TV Serial Updates: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलेलं असताना त्यांच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात आहे.
-
या मालिकेत नुकताच जीवा-नंदिनीची मनधरणी करत असतानाचा सीन चित्रीत करण्यात आला.
-
समुद्र किनारी एकटक पहात असलेल्या नंदिनीसमोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो अश्या आशयाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
-
अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात.
-
नंदिनी आणि जीवाची भूमिका साकारणाऱ्या विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखी खुलवलाय.
-
या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगतेय त्याचे शब्द काहीसे असे आहेत.
-
“तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं… तू सुगंध गज-याचा, माझं फिकं फिकं अत्तर..तुला पडणा-या प्रश्नाचं, मी शोधू पाहातोय उत्तर…”
-
“सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ…माझ्याही जुन्या फिलिंग्जवर जमली होती धूळ…. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला काहीच कळत नाही…सगळं कळूनसुद्धा, वेळेत वळत नाही”
-
“पण तू पिळलास कान, आता आलीये मला जाग…आता तरी सोडून दे, नंदिनी तुझा राग… तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं..”
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

Maharashtra Assembly Monsoon Session Clash Live Updates : “लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत”, पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा सभागृहात संताप