-
उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबतच व्यायामाचीही गरज असते. दिवसातून ३०-४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते.
-
परंतु, बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी कित्येकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक जण व्यायाम करण्यास कंटाळा करतात.
-
नियमित व्यायाम आणि योग्य आहार न घेतल्यास मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार उद्भवू शकतात.
-
करोनामुळे अनेक जण घरातूनच काम करत आहेत. एकाच जागी बसून काम केल्याने आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचे वजन वाढून लठ्ठपणा येऊ शकतो.
-
यासाठी नियमित व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होऊन तुम्ही तंदुरुस्त राहाल.
-
योग्य आहार आणि व्यायाम न केल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहासारखा आजार उद्भवतो.
-
दिवसेंदिवस मधुमेह असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत चालले आहे. जगातील मधुमेह असणाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
-
अनेक जण हाडे आणि सांधेदुखीच्या तक्रारी करतात.
-
व्यायाम न केल्यामुळे शरीर, पाठ, कंबर किंवा हात पाय दुखतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
-
व्यायाम न केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नैराश्य देखील येऊ शकते.
-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते.
-
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का