-
आजकाल प्रत्येक लहान मुलाचा मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक लहान मुलं तर मोबाईल नसेल तर जेवत सुद्धा नाहीत, त्यामुळे त्यांचा हट्ट नाईलाजाने पालकांना पूर्ण करावा लागतो.
-
पण या वाढलेल्या स्क्रिन टाइममुळे लहान मुलांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन त्यांची दृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान वयात देखील मुलांना चष्मा वापरावा लागत आहे.
-
मुलांच्या वाढत्या स्क्रिन टाइममुळे अनेक पालक चिंतेत असतात. यावर उपाय करण्यासाठी मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
-
कठीण कवचाची फळे : कठीण कवचाची फळे – काजू, बदाम, शेंगदाणे ‘विटॅमिन ई’चे उत्तम स्रोत मानले जातात, त्यामुळे लहान मुलांनी याचे सेवन केल्यास त्यांची दृष्टी सुधारण्यासाठी नक्की मदत मिळू शकते.
-
यासह कठीण कवचाची फळे ‘मायोपिया’वरील घरगुती उपचारासाठी उत्तम पर्याय मानले जाते. मायोपिया म्हणजे दूरची दृष्टी अस्पष्ट होण्याची अवस्था.
-
काजू, बदाम, शेंगदाणे यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते. ‘ओमेगा ३ फॅटी ऍसिड’मुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि डोळ्यांचे विकार कमी होण्यास मदत होते.
-
हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटॅमिन ए, सी आणि बी १२ आढळते, जे दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
-
तसेच यामुळे मुलांमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन हे आजार रोखण्यास मदत करते. त्यामुळे मुलांच्या आहरात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
-
मासे : माशांमध्ये देखील ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते, जे लहान मुलांच्या रेटीनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. तसेच हे डोळ्यांचे स्नायू मजबूत करण्यास आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
-
गाजर : लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी गाजर फायदेशीर ठरते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे डोळ्यांच्या रेटीनासाठी फायदेशीर ठरते तसेच त्यामुळे सुर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते.
-
स्ट्रॉबेरी आणि आंबट फळं : स्ट्रॉबेरी आणि संत्री, मोसंबी अशा आंबट फळांमध्ये ‘विटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात आढळते.
-
‘विटॅमिन सी’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सोबतच डोळ्यांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(फोटो सौजन्य : Freepik)

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान