-
उन्हाळ्यासह आंब्यांच्या सीझन सुरु झाला आहे. यामुळे वर्षभर आंब्याची वाट पाहणाऱ्यांसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध झाले आहेत.
-
उन्हाळ्यात चवदार, स्वादिष्ट आंबे खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. यामुळे लहानांपासून मोठेही अगदी आवडीने आंबे खातात.
-
पण नेहमी आंबा पाण्यात भिजवूनचं मगच खा असे का सांगितले जाते? आणि तसे न केल्यास काय नुकसान होऊ शकते जाणून घेऊ…
-
आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यावरील केमिकलचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्हीही आंबा न भिजवता खात असाल तर ही सवय आजचं बदला.
-
आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या वाढते.
-
आंबा हा स्वभावाने उष्ण असतो, यामुळे शरीरातही उष्णता वाढते आणि पचनसंस्था आणि आतड्यांवर परिणाम होतो. पण तो भिजवून खाल्ल्यास पोटाचा त्रास कमी होतो
-
आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.
-
आंब्याच्या देठावरून एक पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो, ज्यात फायटिक एॅसिड असते. ज्यामुळे आंब्याची चव बदलते. त्यामुळे तो काही भिजवून मगच खाल्ला पाहिजे.
-
आंबा खाण्यापूर्वी भिजवण्यामागे केवळ रसायने, घाण आणि धूळ काढणे एवढाच उद्देश नसतो. तो धुवून न घेतल्यास त्याची गुणवत्ता आणि चवही खराब लागते. (photo credit – pixabay, freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”