-
हिंदू धर्मामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, ज्यातील काही व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात.परंतु, जास्त वेळ उपवास करणे किंवा सततच्या उपवासांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
फरिदाबादमधील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. पूजा सी ठुकराल म्हणतात की, उपवास वाढवल्यास मासिक पाळी, चयापचय आणि तणावाच्या प्रतिक्रिया यांसारख्या गंभीर शारीरिक कार्यांचे नियमन करणाऱ्या अत्यावश्यक हार्मोन्समध्ये चढ-उतार होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. ठुकराल यांच्या मते, इन्सुलिन हा प्राथमिक हार्मोनपैकी एक आहे, जो उपवासामुळे प्रभावित होतो. जर उपवास विस्तारित कालावधीसाठी चालू राहिल्यास एक नियमित सराव बनतो, शरीर तणाव हार्मोन कॉर्टिसॉल वाढवून प्रतिसाद देऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उच्च कोर्टिसोल पातळी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या पुनरुत्पादक हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते. काही स्त्रियांसाठी याचा परिणाम मासिक पाळीत अनियमितता, मूड बदलणे किंवा सामान्य थकवा जाणवू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
याव्यतिरिक्त, उपवासामुळे भूक आणि ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी जबाबदार हार्मोन लेप्टिनचा स्तर कमी होऊ शकतो. जेव्हा लेप्टिनची पातळी कमी असते, तेव्हा शरीरातील ऊर्जा वाचवण्याचा सिग्नल म्हणून याचा अर्थ लावला जाऊ शकतो, ज्यामुळे मासिक पाळी आणि प्रजननक्षमतेवर संभाव्य परिणाम होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. ठुकराल सांगतात की, जेव्हा उपवासामुळे शरीरावर ताण येतो, तेव्हा ते पुनरुत्पादनापेक्षा जगण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यांना प्राधान्य देऊ शकते. यामुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते, ज्याला अमेनोरिया म्हणतात. तसेच काही स्त्रियांमध्ये हार्मोनल शिफ्टमुळे उपवास करताना मूड बदलणे, थकवा येणे आणि हार्मोनल असंतुलनाशी संबंधित इतर लक्षणेदेखील सामान्यपणे नोंदवली जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या हार्मोनल असंतुलन असलेल्या स्त्रियांमध्ये उपवासामुळे ही लक्षणे वाढू शकतात, ज्यामुळे परिस्थिती व्यस्थित करणे अधिक कठीण होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उपवास सर्वच महिलांच्या आरोग्यासाठी योग्य असू शकत नाही. आजार असलेल्या किंवा उपवासामुळे अशक्तपणा जाणवणाऱ्या महिलांना जास्त पोषक पदार्थांची आवश्यकता असते. डॉ. ठुकराल यांनी सांगितले की, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना या अवस्थेत पौष्टिक गरज लक्षणीयरीत्या जास्त असते आणि उपवासामुळे आई आणि गर्भाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उपवासामुळे अस्वास्थ्यकर वर्तन निर्माण होऊ शकते आणि मानसिक आरोग्याची स्थिती बिघडू शकते. मधुमेह किंवा थायरॉईड विकारांसारख्या आरोग्य समस्या असलेल्या महिलांनी केवळ वैद्यकीय देखरेखीखालीच उपवास करावा, कारण यामुळे गंभीर आरोग्य धोके होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”