-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार, १७ ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर असून ३० ऑगस्ट रोजी बुधाने देखील याच राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे सिंह राशीमध्ये बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १५ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि १७ सप्टेंबर रोजी सूर्यदेखील याच राशीत प्रवेश करेल. दरम्यान, आता निर्माण झालेला हा आजपासून पुढील राजयोग जवळपास ८ दिवस असेल. त्यामुळे पुढील ८ दिवस १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधादित्य राजयोगाचा मिथुन राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीसाठी बुधादित्य राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात नव्या गोष्टींशी जोडले जाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय