-
पुणे : पानशेत धरण फुटून १२ जुलै १९६१ रोजी पुण्यात झालेल्या जलप्रलयाला सोमवारी साठ वर्षे पूर्ण होत आहेत.
-
पुराच्या पाण्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले. काही वेळातच अनेकांचे संसार वाहून गेले आणि होत्याचे नव्हते झाले.
-
१२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत घरण फुटले आणि पुराचे पाणी शहरात शिरले.
-
बंडगार्डन पुलाचा अपवाद वगळता शहरातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते.
-
शनिवार, नारायण, कसबा आणि सोमवार पेठ भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अनेकांचे संसार पुराच्या पाण्याने वाहून गेले.
-
पण आज आम्ही तुम्हाला त्या कटू आठवणीत न नेता तुम्हाला पानशेतच्या निसर्ग रम्य परिसर दाखवणार आहोत.
-
चला तर त्या कठीण काळाची आठवण बाजूला ठेऊन या निसर्गाचा आनंद लुटूया.
-
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरी बांधलेलं हे पानशेत धरण.
-
हे धरण पुण्यापासून आग्नेय दिशेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे.
-
या धरणाच्या पाणी साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वर्षा भुते / लोकसत्ता)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक