-
राज्याच्या राजकारणात गुरुवार (३० जून) धक्कातंत्राचा दिवस ठरला.
-
आधी असा अंदाज लावण्यात आला की भाजपा आणि शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील.
-
यात सर्वात मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
-
मात्र, राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी पहिला धक्का दिला.
-
भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देईल. या नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासह मागील अनेक दिवसांपासूनचे सर्व अंदाज फोल ठरले.
-
विशेष म्हणजे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची निवड जाहीर करताना आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं.
-
मी सरकारमध्ये सहभागी नसेल, पण माझा सरकारला पूर्ण पाठिंबा असेल. सरकार व्यवस्थित चालण्यासाठी माझं पूर्ण सहकार्य असेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
-
यावेळी फडणवीस यांनी आत्ता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल आणि काही दिवसांमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही नमूद केलं.
-
बाहेर पाऊस असल्याने आणि कुणालाही निमंत्रण देणे शक्य नसल्याने हा शपथविधी अगदी थोडक्यात होईल आणि कोणत्याही कार्यकर्त्यांना प्रवेश नसेल असं सांगत देवेंद्र फडणवीस सर्व कार्यकर्त्यांची माफीही मागितली.
-
यानंतर राजभवनमध्ये शपथविधीसाठीच्या तयारीची लगबग सुरू झाली. मंचावर राज्यपाल आणि शपथ घेणाऱ्या भावी मुख्यमंत्र्यांसाठी अशा दोन खुर्ची ठेवण्यात आल्या.
-
मात्र, याच काळात राजकीय घडामोडींना वेग आला आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वृत्तसंस्था एएनआयला प्रतिक्रिया दिली.
-
या प्रतिक्रियेत नड्डा यांनी केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची सूचना केल्याची माहिती दिली.
-
विशेष म्हणजे या नंतर लगेचच भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी जे. पी. नड्डा यांची विनंतीला मान देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.
-
यानंतर राज्याच्या राजकारणात एकाच दिवशी दुसरा धक्का बसला. सर्वच स्तरातून या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
-
देवेंद्र फडणवीस यांनी आधी सरकार बाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला असताना अचानक सरकारमध्ये सहभागी कसे झाले असाही प्रश्न विचारण्यात आला.
-
यानंतर नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोनदा फोनवरून चर्चा केली.
-
तसेच मोदींनी फडणवीसांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आदेश दिल्याचंही बोललं गेलं.
-
शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं.
-
आम्हाला कुणालाही या निर्णयांची कल्पना नव्हती असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
-
यावेळी शरद पवार यांनी भाजपात दिल्ली व नागपूर येथून येणारे आदेश फार महत्त्वाचे असतात. ते तंतोतंत पाळावे लागतात, असं सांगितलं.
-
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मुख्यमंत्री नंतरच्या काळात मंत्री झाले, मात्र, हे पहिले मुख्यमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री झाले, असंही नमूद केलं. (सर्व फोटो सोशल मीडिया)

Jayant Patil: “ज्यांनी राजीनामा दिला, त्यांना…”, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया