-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्या एका फोनवर गुवाहटीला एकनाथ शिंदे गटात गेले असं वक्तव्य केलं.
-
यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत बच्चू कडूंनाच विचारणा केली असता त्यांनी फडणवीसांच्या दाव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
-
बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं ते चुकीचं नाही. मला फडणवीसांचा फोन आला होता.”
-
“फडणवीसांनी फोन केला त्यावेळी त्यांच्याशी कशा पद्धतीने काम करणार अशी चर्चा झाली,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
-
“फोनवर ते केवळ गुवाहटीला जा असं म्हटले नाहीत. बरीच चर्चा झाली ती आता येथे सांगणं योग्य नाही,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.
-
बच्चू कडू पुढे म्हणाले, “मी मंत्री व्हावं ही लोकांची इच्छा आहे.”
-
“याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्वासन दिलं आहे,” अशी माहिती बच्चू कडूंनी दिली.
-
“मी मंत्री होईल. मला घाई नाही, माध्यमांना का घाई झाली हे मला कळत नाही,” असं म्हणत त्यांनी माध्यमांवर टीका केली.
-
तसेच मला घाई झालेली नाही, मी मविआ सरकारमध्ये असताना कानोसा घेतला की कोणाचं सरकार बनेल, असंही म्हटलं. (सर्व फोटो संग्रहित)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल