-
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत.
-
अजित पवारांनी नुकतीच ‘सकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणाव्यतिरिक्तही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
या मुलाखतीत त्यांनी भारताच्या लोकसंख्येवरुनही त्यांचं मत मांडलं.
-
अजित पवार म्हणाले, “लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनला मागे टाकलं आहे. १९४७ साली भारताची लोकसंख्या ३२-३५ कोटी होती.”
-
“आता २०२३मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश असा आपला नावलौकीक झाला आहे.”
-
“आता कठोर निर्णय घेतले गेले पाहिजेत. किती अपत्य जन्माला घालावीत हे कोणत्याही जातीत, धर्मात किंवा पंथात सांगितलेलं नाही.”
-
“अपत्य परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते. ही नवरा-बायकोची कृपा असते. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे,” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.
-
पुढे ते म्हणाले, “मुलीलाही तेवढाच अधिकार आणि मानसन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी काही बिघडत नाही.”
-
“लेकच बापाचं नाव काढते. मुलगा नाव नाही काढत. मुलगा नाव घालवतो.”
-
“संजय गांधी आता नाहीत पण १९७५ सालातील कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता.”
-
“तर आज लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते कमी झालं असतं.”
-
“सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे. पण तरुणांची संख्या किती असावी, यावर मर्यादा पाहिजे. यामुळे पुढच्या पिढीचं नुकसान होता कामा नये.”
-
“याबाबत आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करुन कठोर निर्णय घेतला गेला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.
-
(सर्व फोटो : अजित पवार/ फेसबुक)

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”