-
-
पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर ६ गडी राखून मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
-
जाणून घेऊयात या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंकडून नोंदवले गेलेले ६ विक्रम…
-
भारताने विंडीजच्या २०८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला भारतीय संघाचा हा सर्वोत्तम पाठलाग ठरला. याआधी २००९ साली भारताने श्रीलंकेविरुद्ध २०७ धावांचं लक्ष्य पार केलं होतं.
-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटमधली ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.
-
विंडीजच्या केजरिक विल्यम्सने ३.४ षटकांत ६० धावा मोजल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विंडीजच्या गोलंदाजाने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
-
विराट कोहलीला अर्धशतकी खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. टी-२० क्रिकेटमधला हा त्याचा १२ वा सामनावीराचा पुरस्कार ठरला. कोहलीने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीशी (१२ सामनावीर पुरस्कार) बरोबरी केली. तर पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा ११ सामनावीर पुरस्कारांचा विक्रम मोडला.
-
विंडीजच्या फलंदाजांनी पहिल्या टी-२० सामन्यात १२ षटकार ठोकले. कोणत्याही पाहुण्या संघाने भारतात टी-२० क्रिकेटमध्ये ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत.
-
युजवेंद्र चहलने २ बळी घेत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-२० बळी घेणाऱ्या रविचंद्रन आश्विनशी बरोबरी केली आहे.
-
आश्विन आणि चहल या दोन्ही खेळाडूंच्या नावावर सध्या ५२ बळी असून, या यादीत बुमराह ५१ बळींसह दुसऱ्या स्थानी आहे.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन; म्हणाला…