-
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल ३७२ धावांनी नमवले आहे.
-
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. (ICC/Twitter)
-
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला.
-
न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.
-
या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही.
-
या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता.
-
मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (ICC/Twitter)
-
खेळाडू म्हणून विराट कोहलीचा हा कसोटीतील ५० वा विजय आहे.
-
(Photo Source: BCCI/Twitter)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”