-
आयपीएलचे १५ वे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. या हंगामात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, तर काही खेळाडू यावेळी आपली कमाल दाखवू शकलेले नाहीत.
-
आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांना नंतर भारतीय संघात स्थान मिळालेले आहे.
-
याच निमित्ताने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
-
शिखर धवन हा खेळाडू आयपीएलध्ये सर्वात यशस्वी राहिलेला खेळाडू आहे. तो आतापर्यंत मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून खेळलेला आहे.
-
या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत २०१२, २०१६, २०१९, २०२१ या पर्वामध्ये ५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
-
केएल राहुलने या हंगामात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आयपीएलच्या पदार्पणातच ६५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याने ५९३ धावा केल्या.
-
२०२० सालच्या हंगामामध्ये राहुलने ६७० तर २०२१ साली त्याने ६२६ धावा केल्या होत्या. या वर्षीदेखील तो ५०० पेक्षा जास्त धावा करण्याची दाट शक्यता आहे.
-
विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहेत. २०११ साली त्याने पहिल्यांदाच ५०० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर २०१३ साली त्याने ६३४ धावा केल्या.
-
२०१५ साली कोहलीने ५०५ धावा केल्या. तर २०१६ साली त्याने रेकॉर्डब्रेक अशा ९७३ धावा करुन सर्वांनाच चकित केले. २०१८ सालच्या आयपीएल पर्वामध्ये त्याने ५३० धावा केल्या आहेत.
-
डेविड वॉर्नरनेही आयपीएलमध्ये चांगला खेळ करुन दाखवलेला आहे. त्याने २०१४ ते २०२० या सलग सहा वर्षात ५२८,५६२, ८४८, ६४१, ६९२, ५४८ अशा धावा केल्या होत्या.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”