-
देशात, तसंत राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यालाच आळा घालण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च पर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
-
संचारबंदी लागू केल्यानंतर ही अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अनेक जण विनाकारण गाड्यांवरून फिरताना दिसले होते. त्यांच्यावर पुण्यात कारवाई करण्यात आली.
-
पुण्यात अत्यावश्यक सेवांच्या वाहनांशिवाय इतर वाहनांवर बंदी घालण्यावरही सोमवारी विचार करण्यात येत होता.
-
संचारबंदीच्या आदेशानंतर पोलिसांनी रस्त्यात अनेक ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
-
संचारबंदीच्या आदेशानंतरही अनेकांमध्ये तितक गांभीर्य दिसून येत नव्हतं. त्यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली.
-
पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये रस्त्यावर उभं राहून पोलीस सर्वांची चौकशी करताना दिसत होते.
-
विनाकारण घराच्या बाहेर पडलेल्या लोकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खायला मिळाल्याचं पहायला मिळालं.
-
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”