
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन महिने बंद असलेली देशांतर्गत नागरी विमान सेवेला आजपासून सुरुवात झाली. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन) -
त्यामुळे इतर राज्यांमधून मुंबईत आगमन झालेले नागरिक विमानतळाबाहेर पडण्यापूर्वी स्क्रिनिंगसाठी मुंबई विमानतळावर प्रतिक्षेत होते.
-
सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग झाल्याशिवाय विमानतळातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांनी सुरक्षेसाठी आपल्या तोंडावर मास्क लावलेले दिसत होते.
-
लॉकडाउननंतर ठप्प झालेली व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
-
देशांतर्गत विमान प्रवास सुरु झाल्याने अनेकांनी समाधनही व्यक्त केले आहे.
-
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथून विमानाने मुंबईत परतलेली मुस्लिम महिला.
-
आपल्या कुटुंबासह देशाच्या इतर भागात अडकलेले प्रवासी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत.
-
एका आजारी वृद्ध व्यक्तीचेही विमानाने मुंबईत आगमन झाले. यावेळी संबंधित व्यक्तीची तपासणी करण्यासाठी पीपीई किट घालून सज्ज असलेला कर्मचारी.
-
या महिलेला डॉक्टरांकडून ९ मे पर्यंत क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. आपल्या हातावर मारलेला क्वारंटाइनचा शिक्का दाखवताना महिला.
-
विमान प्रवास करणाऱ्या बहुतांश सर्वच प्रवाशांनी आपल्या तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घातलेले पहायला मिळाले. एकूण आजच्या लॉकडाउननंतरच्या पहिल्याच विमान प्रवासावर करोनाच्या भीतीचे सावट दिसत होते.
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…