-    लॉकडाऊन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यानंतर राज्यातील महत्वाच्या शहरांमधले कामगार घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन) 
-    पुणे रेल्वे स्थानकाबाहेर जमलेली कामगारांची गर्दी 
-    यातले अनेक कामगार पश्चिम बंगालला जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 
-    परंतू सध्या अम्फान चक्रीवादळानंतर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पश्चिम बंगालने राज्यात येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कामगारांवर पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे. 
-    रेल्वे अधिकाऱ्यांकडून काहीतरी माहिती मिळेल या आशेने हे कामगार इथे जमलेले आहेत., मधल्या वेळेत झोप घ्यायची आणि काही सूचना मिळते का याची वाट पहायची एवढच या कामगारांच्या नशिबी उरलेलं आहे. 
-    गेल्या काही महिन्यांमध्ये या कामगारांनी खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत. 
-    अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं फारसं भान यांना राहत नाही. 
-    पुणे शहरालाही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. 
-    आपल्याला घरी कधी जायला मिळणार हाच विचार या महिलेच्या मनात घोळत असेल 
-    इतक्या गर्दीतही या महिला कामगार शक्य होईल तितकं सरकारी नियमांचं पालन करत आहेत. 
-    सेवाभावी संस्थाकडून मिळणाऱ्या जेवणावर यांना अवलंबून रहावं लागत आहे. 
-    गाडीची काही सूचना मिळते का याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या आजीबाई….वय झालं तरीही यांच्या नशिबातला संघर्ष काही केल्या संपत नाही. 
-    कात्रज भागात टेम्पोमधून सोलापूरच्या दिशेने निघालेलं कामगाराचं कुटुंब (फोटो – आशिष काळे) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  