-
लॉकडाउन काळात मुंबईला रामराम करुन आपल्या गावी परतलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी पुन्हा एकदा मुंबईकडे परतायला सुरुवात केली आहे.
-
मुंबईच्या LTT स्थानकात इतर भागातून आलेल्या कामगारांची गर्दी पहायला मिळते आहे. (सर्व छायाचित्र – प्रदीप दास)
-
बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं इथे विशेष थर्मल चेकिंग केलं जात आहे.
-
कोणत्याही व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणं नाहीत ना याची खास तपासणी केली जात आहे.
-
महाराष्ट्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी काही उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे.
-
काही भागांमध्ये जिवनावश्यक वस्तूंसोबतच इतर दुकानंही सुरु झाली आहेत.
-
मुंबई हे शहर असंच आहे, इथे प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो.
-
दोन महिन्यांपूर्वी करोनामुळे परतलेल्या कामगारांनी पुन्हा एकदा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखेरीस मायानगरीची वाट पकडली आहे.
-
भलेही गेल्या दोन महिन्यांत या कामगारांना त्रास सहन करावा लागला असेल पण हे शहर आपल्याला उपाशी ठेवणार नाही ही आशा मनात घेऊन ही मंडळी पुन्हा शहरात आली आहेत.
-
आता पुढचे काही दिवस या कामगारांचं संघर्षमय आयुष्य सुरु होणार आहे, पण स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा संघर्ष करण्याचीही या कामगारांची तयारी आहे.

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण