-
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
-
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.
-
या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्ग सोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांबरोबर वेगवेगळया ठिकाणी चकमक झाली.
-
यावेळी पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.
-
काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.
-
यावेळी झालेल्या हिंसाचारात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
-
पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. एका ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या.
-
परिस्थिती चिघळल्यानंतर हे आंदोलक शेतकरी तलवारी काढून पोलिसांच्या मागे लागले होते.
-
दिलशाद गार्डन येथे ड्युटी बजावत असताना दिल्ली पोलिसांचा एक कर्मचारी बेशुद्ध पडला.
-
शुद्धीत आल्यानंतर दिल्ली पोलिसाच्या या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
-
नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला.
-
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
-
मागच्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज पहिल्यांदाच हिंसक वळण लागलं.
-
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देऊन एक समिती स्थापन केली आहे.
-
दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे.

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो