-
उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
-
सध्या पुन्हा एकदा जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असून, दक्षिण आणि पूर्वोत्तर प्रांतातील काही भाग वगळता जवळपास ७५ टक्के भारताला उष्णतेचा तडाखा बसला आहे.
-
गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस इतके होते.
-
बुधवारपेक्षा गुरुवारी तापमानात किंचित घट असली तरी दुपारचा उकाडा नागरिकांना असह्य होत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे.
-
रोजच टप्प्याप्प्प्याने वाढत असलेल्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
-
उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांसह मध्य भारतात सध्या उष्णतेची लाट आहे.
-
उत्तर भारतातील कमाल तापमानात पुढील दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे.
-
परिणामी महाराष्ट्रातील तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल