-
‘शून्य सावली दिवस’ ही भौगोलिक घटना लहान-थोरांना अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे.
-
शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते.
-
आज नागपूरकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस.
-
१२ वाजून १० मिनीटांनी आज शून्य सावली झाली होती.
-
रामन विज्ञान केंद्रावर शून्य सावली अनुभवायला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
-
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो.
-
म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.
-
सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो.
-
महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत. (फोटो सौजन्य : धनंजय खेडकर, लोकसत्ता (नागपूर))

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा