-
Indian citizenship : गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये तब्बल २ लाखांहून अधिक भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
केंद्र सरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, हा आकडा २०२४ च्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत थोडासा कमी आहे. या संदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून राज्यसभेत देण्यात आली आहे.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं? याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला राज्यसभेत सादर करण्यास सांगण्यात आलं असता राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही आकडेवारी सादर केली.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
कोणत्या वर्षांत किती लोकांनी नागरिकत्व सोडलं? : २०२४ मध्ये २,०६,३७८, २०२३ मध्ये २,१६,२१९, २०२२ मध्ये २,२५,६२०, २०२१ मध्ये १,६३,३७०, २०२० मध्ये ८५,२५६, २०१९ मध्ये १,४४,०१७ जणांनी भारतीय नागरिकत्व सोडलं असल्याची ही आकडेवारी समोर आली आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या या आकडेवारीवरून असं दिसून आलं की २०१९ पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत कोणतीही रेषीय वाढ झालेली नाही.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
पण २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांचा आकडा २०२३ आणि २०२२ मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा किंचित कमी आहे. मात्र, २०२१, २०२० आणि २०१९ मधील आकडेवारीपेक्षा जास्त आहे.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
काही भारतीय नागरिक त्यांचं संपूर्ण आयुष्य परदेशात घालवतात, पण तिथले नागरिकत्व घेत नाहीत. तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होतात. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
अनेकदा विचारलं जातं की भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी काय प्रक्रिया असते. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)
-
दरम्यान, अर्जदाराने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जानंतर संबंधित कागदपत्राची पडताळल्याच्या पोचपावतीच्या ३० दिवसांनंतर संबंधित प्रमाणपत्र मंजूर केले जातं.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

Mumbai Heavy Rain Alert: मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार; तर ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा