-
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
-
अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. यानंतर आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
-
या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.
-
अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
-
देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही- अरविंद केजरीवाल
-
आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली – अरविंद केजरीवाल
-
जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू… आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या (भाजपा) पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत- अरविंद केजरीवाल
-
उद्धव ठाकरे यांच्या पार्टीची चोरी झाली आहे. त्याच्या पक्षाचं चिन्ह चोरी झालं. त्यांच्या पक्षाचं नाव चोरी गेलं- अरविंद केजरीवाल
-
उद्धव ठाकरेंकडे जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं- अरविंद केजरीवाल
-
मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे.- उद्धव ठाकरे
-
त्यामुळे मी पूर्ण आशा करतो की, सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल. आणि आगामी प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना प्रचंड यश मिळेल- अरविंद केजरीवाल (सर्व फोटो- लोकसत्ता/एएनआय)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”