-
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
-
२४ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणावर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषण केलं जाईल, असा अंतिम इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
-
२४ तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.
-
दरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांच्या कामावर शंका उपस्थित केली आहे.
-
मराठा आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे, अशी विनंती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती- मनोज जरांगे
-
राज्यात मराठा समाजाची संख्याही खूप आहे. इतक्या मोठ्या समाजाची जर तुम्ही दखल घेणार नसाल तर हे दुर्दैव आहे- मनोज जरांगे
-
पूर्वी आम्हाला वाटत होतं की, तुम्ही (पंतप्रधान मोदी) गोरगरीबांची दखल घेताय, पण आता कुठेतरी आम्हाला बारीकपण वाटायला लागलं आहे- मनोज जरांगे
-
पंतप्रधान मोदींना विनंती करून सात दिवस झाले, पण त्यांनी सरकारला कसलीही सूचना दिली नाही. त्यामुळे ते खरंच गोरगरीबांची दखल घेतायत का? यावर थोडी शंका यायला लागली आहे- मनोज जरांगे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ एक फोन करू द्या आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, असं सांगू द्या. तर लगेच मराठ्यांना आरक्षण मिळेल- मनोज जरांगे
-
नरेंद्र मोदींचा फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना फोन आला, तर मराठा आरक्षणाची घोषणा होईल आणि सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येतील- मनोज जरांगे
-
पण गोरगरीबांवर लक्ष द्यायला, त्यांच्याकडे वेळ आहे की नाही? यावर शंका आहे- मनोज जरांगे
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर