-
तामिळनाडू
भारतात अनेकदा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दीमुळे चेंगराचेंगरीचे दुःखद प्रकार घडले आहेत व त्यात सामान्य नागरिकांचे दुर्देवी मृत्यू झाले आहेत. काल २७ सप्टेंबर २०२५ रोजीही करूर येथे थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटनाही पुन्हा एकदा गर्दीचे योग्य नियंत्रण आणि सुरक्षा उपायांची उदासिनता अधोरेखित करते. -
१० वर्षांत अनेक घटना
दरम्यान, यापूर्वीही धार्मिक कार्यक्रम, मेळावे, सत्संगामध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्देवी घटना घडून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. प्रश्न असा आहे की अशा घटना घडण्यामागचं कारण काय? एका घटनेतून जागरूक झाल्यानंतरही आपण पून्हा कसे हलगर्जीपणाने वागू शकतो? आयोजक, प्रशासन की नागरिक यामध्ये दोष द्यायचा तरी कोणाला? चला जाणून घेऊ मागच्या दहा वर्षातल्या चेंगराचेंगरी आणि त्यातील नुकसानाबद्दल.. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
बंगळुरू
यावर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजय मिळवला. तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचा चषक उंचावला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, मात्र या आनंदाला गालबोट लागणारी एक घटना घडली होती. विजयानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
राजमुंदरी पुष्करम २०१५
१४ जुल्ले २०१५ या दिवशी आंध्र प्रदेशमधील राजमुंदरीमध्ये पुष्करम उत्सवादरम्यान गोदावरी नदीवर हजारो लोक पोहोचले होते. मात्र घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत २७ लोकांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
वैष्णोदेवी मंदिर २०२२
१ जानेवारी २०२२ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेतील जखमींचा आकडा मोठा होता. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
हाथरस २०२४
उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी भोलेबाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात १२१ जणांचा बळी गेला तर अनेक लोक जखमी झाले होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
प्रयागराज महाकुंभ २०२५
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेने या मालिकेत नवा अध्याय जोडला गेला. चाळीस दिवस चालणार्या महाकुंभमेळ्यातही चेंगराचेंगरीने भाविकांचा मृत्यू झाला. महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली होती. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
नवी दिल्ली २०२५
१५ फेब्रुवारी २०२४ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता आणि डझनभर लोक जखमी झाले होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित) -
रेल्वे स्थानकावर जमलेली गर्दी प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात होती. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Tamil Nadu stampede: राजकारणासाठी सिनेक्षेत्र सोडणारा विजय थलपती कोण आहे? त्याने कोणता पक्ष स्थापन केलाय?

हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पुढच्या काही सेकंदात काय कराल? जीव कसा वाचवता येतो? जाणून घ्या ५ महत्त्वाचे मुद्दे!