पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या सरकारमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागल्याचा आरोपही त्यांनी केला.
कल्याण डोंबिवली मतदार संघामध्ये गोपाळ लांडगे या कडवट शिवसैनिकाची तिकीट कापून तेव्हा राजकारणातही नसलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी हट्ट धरणे याला पुत्रप्रेम म्हणतात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
महायुतीत नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार, उमेदवार कोण असणार, याची स्पष्टता गुरुवारी होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेची (शिंदे गट) ही जागा असून ती आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके म्हणाले, या महिन्यानंतर काय होईल ते माहिती नाही. महायुती टिकावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून दुष्काळी भागात पाणी पोहोचविता आले नाही म्हणून केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांना टोला लगावला.