scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

(केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परदेशी विद्यापीठांना शनिवारी इरादा पत्र देण्यात आले.)(लोकसत्ता टिम)
महामुंबई जागतिक शिक्षणाचे केंद्र, मुख्यमंत्र्यांचा विश्वास; पाच नामांकित परदेशी विद्यापीठांना इरादापत्रे

मुंबई महानगर प्रदेश जागतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण परदेशी विद्यापीठांमार्फत सुरू करण्यासंदर्भात २००४ पासून विचार सुरू होता.

वारसांना पीएमएवाय योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणी आहे. (संग्रहित छायाचित्र)
गिरणी कामगारांनाही घरासाठी अडीच लाखांचे अनुदान द्या – कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया . (संग्रहित छायाचित्र)
जरांगे सारखीच अवस्था सरकार बच्चू कडूंची करणार; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप

भाजप प्रणित हे सरकार बच्चू कडूचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, असे जाधव म्हणाले.

माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आढावा बैठकीत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित; वन कायद्याचा धाक दाखवून रस्ता नांगरणे भोवले

वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून निलंबन करावे, अशी शिफारस सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

संघ आणि भाजप यांच्यात समन्वय ठेवण्याचा या बैठकीचा उद्देश असतो. (प्रातिनिधिक छायाचित्र)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या संघ – भाजप समन्वय समितीची बैठक

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली.(छायाचित्र - लोकसत्ता टीम)
बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेताच महसूल मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले, “ कडूंना मुख्यमंत्र्यांनी आधीच….”

शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी तात्पुरतं स्थगित करण्यात आलं.

आमदार सुलभा गायकवाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे धनादेश वाटप करताना (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
कल्याण पूर्व इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून ३० लाखाची मदत

कल्याण पूर्वेतील सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून मृत्युमुखी पडलेल्या सहा रहिवाशांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत शनिवारी वितरित करण्यात आली.

Raj Thackeray and Uddhav Thackeray with Shivsena Chief Balasaheb Thackeray
राज-उद्धव एकत्र? राज्यातल्या नेत्यांचे अंदाज काय?

Raj and Uddhav Thackrey alliance: मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची अद्याप भेट झालेली नाही किंवा त्यांच्या संघांना युतीची चर्चा सुरू करण्याबाबत काही निर्देशही मिळालेले नाहीत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
VIDEO : पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून मोठा गोंधळ घातला आहे.

उपोषणादरम्यान बच्चू कडू यांच्या पत्नीचा अश्रू ढाळणारा संदेश (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
“विमान अपघाताने जसा देश हादरला, तसा शेतकरी आत्महत्यांनीही हादरायला हवा”, बच्चू कडूंच्या पत्नीचे भावनिक आवाहन

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित बातम्या