वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…